चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागात आहे. पूर्वीचे चांदा १९६४ मध्ये अधिकृतरित्या चंद्रपूर झाले. चंद्रपूर ही गोंड राजांची राजधानी होती व नंतर १७ व्या शतकात नागपूरच्या भोसले मराठ्यांनी चंद्रपूर ताब्यात घेतले. इ.स.१९८१ला चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन नवा गडचिरोली जिल्हा अस्तित्वात आला. चंद्रपूर जिल्ह्याला काळ्या सोन्याची भूमी (Black Gold City) म्हणतात, कारण जिल्ह्यात अनेक कोळसा खाणी आहेत.
चंद्रपूर जिल्हा चांदा जिल्हा | |
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा | |
महाराष्ट्र मधील स्थान | |
देश | भारत |
राज्य | महाराष्ट्र |
विभागाचे नाव | नागपूर |
मुख्यालय | चंद्रपूर |
तालुके | • चंद्रपूर (तालुक्याचे ठिकाण) • पोंभुर्णा • चिमूर • वरोरा • ब्रम्हपूरी • राजुरा • मूल • सिंदेवाही • कोरपना • जिवती व •बल्लारपूर |
क्षेत्रफळ | |
- एकूण | १०,००० चौरस किमी (३,९०० चौ. मैल) |
लोकसंख्या | |
-एकूण | १०००००० (२०११) |
-लोकसंख्या घनता | ३२२ प्रति चौरस किमी (८३० /चौ. मैल) |
-साक्षरता दर | ८०.०० |
-लिंग गुणोत्तर | १.०६ ♂/♀ |
प्रशासन | |
-जिल्हाधिकारी | विनय गौडा (भाप्रसे) |
-लोकसभा मतदारसंघ | चंद्रपूर (लोकसभा मतदारसंघ), गडचिरोली (लोकसभा मतदारसंघ)(काही भाग) |
-विधानसभा मतदारसंघ | १.चिमूर विधानसभा मतदारसंघ २. राजुरा विधानसभा मतदारसंघ ३. ब्रम्हपूरी विधानसभा मतदारसंघ ४. वरोरा विधानसभा मतदारसंघ |
-खासदार | सुरेश धानोरकर |
पर्जन्य | |
-वार्षिक पर्जन्यमान | ९५४ मिलीमीटर (३७.६ इंच) |
प्रमुख_शहरे | बल्लारशा |
संकेतस्थळ |
जिल्ह्याच्या उत्तरेस नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा व वर्धा जिल्हा, पश्चिमेस यवतमाळ जिल्हा, पूर्वेस गडचिरोली जिल्हा, दक्षिणेस आदिलाबाद जिल्हा (आंध्र प्रदेश) आहे.हा जिल्हा वैनगंगा व वर्धा नदीच्या पात्रांदरम्यान वसला आहे, ह्या त्या जिल्ह्याच्या पूर्व व पश्चिम सीमा बनतात.
जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,४९० किमी२ आहे तर लोकसंख्या २०,७१,१०१ इतकी आहे.
तापमान किमान ७.१ ते कमाल ४७.२ से.च्या दरम्यान असते. पर्जन्यमान १३९८ मि. मी. इतके आहे. जिल्ह्याचे हवामान उष्ण असून मुख्यत: तीन ऋतु आहेत-उन्हाळा पावसाळा व हिवाळा. उन्हाळा मोठा व कडक असतो तर हिवाळा कमी कालावधीचा पण सौम्य असतो. मुख्य पीके तांदूळ (खरिप), कापूस, सोयाबीन, गहू, तूर, मूग, उडीद, मिरची ही आहेत.
बंगाली, तेलुगु सोबत सिंधी व पंजाबी समाज मोठ्या प्रमाणात आहे. मराठी भाषेबरोबरच गोंडी, कोलामी व हिंदी भाषादेखील प्रचलीत आहेत.
जिल्ह्यातील इतर पर्यटनस्थळे:-
पूर्वीच्या नागपूर विद्यापीठ अंतर्गत येणारे शैक्षणिक परीसर आता गोंडवाना विद्यापीठत येते, तर चंद्रपुरात त्यांचे उपकेंद्र मंजूर असून भव्य इमारत बाबुपेठ परीसरात साकारत आहे.
नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठचे कॅम्पस बल्लारपूरात सुरू होत आहे.
चंद्रमा :
चंद्रपुरात वन अकादमी आहे. याचे अधिकृत नांव चंद्रपूर वनविकास, व्यवस्थापन व संशोधन प्रबोधिनी असे आहे, तर संक्षिप्तरूपात यालाच चंद्रमा असे म्हटले जाते. या संस्थेत RFO अर्थात वनक्षेत्रपाल (वन परिक्षेत्र अधिकारी) यांचे प्रशिक्षण होते. ही संस्था मुल रोडवर आहे.
शहराच्या दक्षिणेकडील टोकाला विसापूरनजिक नवीन सुरू झालेले सैनिक विद्यालय उभारण्यात आले आहे. ही संस्था केंद्र शासनाच्या अधिनस्थ कार्य करते.
महत्त्वाचे उद्योग- जिल्ह्यात बल्लारशहा कागद उद्योग, कोळसा खाणी, महाराष्ट्र राज्य औष्णिक विद्युतनिर्मिती व सिमेंट (अल्ट्राटेक, अंबुजा, माणिकगड व ए.सी.सी) हे महत्त्वाचे उद्योग आहेत.
चंद्रपूरात अनेक चुन्याच्या खाणीदेखील आहेत.
महिला राजकारणी
This article uses material from the Wikipedia मराठी article चंद्रपूर जिल्हा, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.