पर्यटनशास्त्र (Tourism) :-पर्यटन ही संज्ञा प्रवास (Tour) या शब्दाशी संबंधित आहे आणि प्रवास (Tour) हा शब्द लॅटिन भाषेतील 'Tornos' या शब्दापासून आलेला आहे.
Tornos शब्दाचा मूळ अर्थ 'वर्तुळ' किंवा 'वर्तुळाकार' असा आहे. याच शब्दापासून पुढे 'वर्तुळाकार प्रवास' किंवा पॅकेज टूर्स हा शब्द रुढ झाला.
एका व्यक्तीने किंवा व्यक्ती समूहाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मनोरंजनासाठी, अभ्यासासाठी, कामासाठी केलेला प्रवास म्हणजे पर्यटन होय.
मनोरंजन, फुरसत किंवा कामासाठी केलेला प्रवास म्हणजेच पर्यटन. जागतिक पर्यटन संस्था (World Tourism Organization) ही 'जे लोक प्रवास करून आपल्या परिसराबाहेरील जागी जाऊन सलग १ वर्षापेक्षा कमी काळ मनोरंजन, काम वा इतर कारणांसाठी रहातात ते' अशी पर्यटकांची व्याख्या करते.
पर्यटन हे फुरसतीचा वेळ घालविण्याचे एक साधन म्हणून जगभरात अतिशय लोकप्रिय झाले आहे. २००० च्या शतकाच्या अखेरीस आलेल्या जागतिक मंदीने व H1N1 फ्लूच्या साथीने २००८ च्या मध्यापासून ते २००९ च्या अखेरपर्यंत रोडावलेल्या पर्यटनाला परत बरे दिवस आले असून २०१२ मध्ये जागतिक पर्यटकांच्या संख्येने १०० कोटीचा पल्ला इतिहासात पहिल्यांदा ओलांडला. आंतरदेशीय पर्यटन उत्पन्न (आंतरदेशीय देणे जमाखात्यातले पर्यटनावरचे उपखाते) २०११त १.०३ लाख कोटी अमेरिकन डॉलर (७४ हजार कोटी युरो) इतके वाढले. ते २०१० च्या तुलनेत ३.८% अधिक होते. २०१२त चीन जगातील पर्यटनावर सर्वात जास्त खर्च करणारा देश बनला आणि त्याने अमेरिका व जर्मनी यांना त्याबाबतीत मागे टाकले. चीन व उदयोन्मुख राष्ट्रे (रशिया व ब्राझील ठळकपणे) ह्यांचा पर्यटनावरचा खर्च गेल्या दशकात लक्षणीय वाढला आहे.
==शब्देतिहास==maharashtatil praytan thale
अतिप्राचीन काळापासून प्रवास ही मनुष्यप्राण्याची सहज प्रवृत्ती आहे. प्राचीन काळातील प्रवासाच्या पद्धती व संकल्पना या आजच्या काळातील प्रवास पद्धती व संकल्पना यापेक्षा वेगळया आहेत. प्राचीन काळी प्रवासाचा उद्देश नवीन प्रदेशचा शोध घेणे, व्यापार करणे व धार्मिक स्थळांना भेट देणे हा होता. हे प्रवासी व व्यापारी विविध भूप्रदेश, देश व राज्यातून प्रवास करत असत. त्यामुळे विविध राज्यांच्या राजधान्या, शहरे, बंदरे, बाजारपेठांची केंद्रे, व्यापारी मार्ग यांचा त्यांच्याषी संबंध येत असे. हा प्रवास व व्यापार यांतून विविध मानवी समूह, संस्कृती यांची परस्पर ओळख झाली. अनेक गोष्टीची देवाण घेवाण झाली. एकमेकांच्या समाजजीवनाचे आकलन झाले. प्रवास व पर्यटनाच्या वाढीसाठी या बाबी अनुकूल ठरल्या. मध्ययुगात व्यापाÚयांच्या प्रवासाच्या पद्धतीत बदल झाले. आनंद मिळविण्यासाठी, मनोरंजनासाठी प्रवास ही संकल्पना प्रथम युरोपातील रोमन लोकांनी रूजवली. रोमन साम्राज्याच्या काळात तेथील लोक इजिप्तमधील पिरॅमिड्स, ग्रीसमधील अथेन्स व स्मार्टा या नगरांची भव्य नगररचना, तेथील देव देवतांची मंदिरे, मूर्ती, तेथील क्रीडांगणे पाहण्यासाठी जात. पुढे युरोपमधील पुनरूज्जीवनामुळे जगभरातील वसाहतींचा व साम्राज्याचा विस्तार, औद्योगिक क्रांती व यातून युरोपमध्ये सुरू झालेला संपत्तीचा ओघ यांमुळे तेथे पर्यटनही श्रीमंतांची मक्तेदारी न राहता मध्यम वर्गसुद्धा पर्यटनात सहभागी झाला. त्यात धर्मप्रसारक, विद्वान, लेखक, कवी व व्यापारी यांचा समावेश होता. युरोपियन पर्यटकांनी आधुनिक पर्यटनाचा पाया घातला.
पर्यटन म्हणजे दैनंदिन प्रवासाव्यतिरिक्त किंवा कामाव्यतिरिक्त केलेला प्रवास.
कामातून सुट्टी मिळाली की त्यानुसार आनंद, मौज करीत निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी केलेले नियोजनबद्ध पर्यटन म्हणजे फुरसतीचे पर्यटन होय.
माणसाला सागरी सफरींची पूर्वी पासून आवड होती, अगदीच पोहण्यापासून ते व्यापरापर्यंतच्या सर्व गोष्टी या सागरामुळे शक्य झाल्या. समुद्र किनारे, बंदरे, सागर सफरी या मुळे समुद्री पर्यटनाचा विकास झाला, टायटॅनिक जहाजामधे जगातील पहिली सागर सफर निघाली, आत्ता आधुनिक काळात छोट्या छोट्या बोटींद्वारे तसेच मोठ्या मोठ्या जहाजांद्वरे देखील समुद्राचे विराट सौंदर्य पहावयास मिळते. तसेच समुद्राच्या गर्भाबद्दल देखील माणसाचे पूर्वीपासून आकर्षण राहिले आहे. त्यातील विविध जीवसृष्टी, जलचर, शैवाल, वनस्पती या पाहण्यासाठी समुद्र पर्यटन वाढवले गेले आहे, शिवाय वॉटरप्रुफ टेक्निक्सचा वापर करून पाण्यात देखील घरे बांधली जात आहेत, त्यात राहण्याचा निराळा आनंद माणूस उपभोगत आहे.
उद्देश : १. पर्यावरण जतन २. पुरातन वस्तूंची हानी न करणे
भारतीय पर्यटनाचा इतिहास हा हजारो वर्षो जुना आहे. हजारो वर्षापासून भारतीय उपखंडात लोक तीर्थक्षेत्रIन्ना भेट देण्याकरीता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत आलेत. भारतीय ग्रंथात सुद्धा याचे पुरावे भेटतात ज्यात, पंढरीची वारी, कुंभमेळा यांचे संदर्भ वाचण्यास मिळतात. तसेच इंग्रजांनी जेव्हा भारतावर राज्य केले तेंव्हा त्यांचा दोन राजधानी असत, हिवाळी राजधानी आणि उन्हाळी राजधानी. इंग्रज उन्हाळ्यात महाबळेश्वरला, शिमला, कश्मीर, उटी, म्हेसूर अशा ठिकाणी राहाण पसंत करत. इंग्रज हे राज्यकर्ते होते आणि त्यांचाकडे कामासाठी किवां निगराणी साठी भारतातील काही राजे महाराजे किवा अधिकारी होते, ज्यांना कामानिम्मित इंग्रजांचा माघे त्या त्या ठिकाणी जावे लागे. भारताला स्वातंत्र्य मिळाले इंग्रज हा देश सोडून गेले पण त्यांचा मागे येथील श्रीमंत घराणे आणि राजे महाराजे यांना मात्र अशा फिरण्याची चटक लागली आणि स्वतंत्र भारतात फिरण्याची वेगवेगळे प्रदेश बघण्याची इच्छा तर प्रत्येक सामान्य माणसाला होती ती या लोकांना बघून उदयास आली आणि अशा प्रकारे आधुनिक भारता मध्ये हिवाळी पर्यटन उदयास आले.
माणसाची श्रद्धा भक्तिभाव देखील पर्यटनास कारणीभूत ठरतो,शिवाय प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा धर्म, स्वतःची संस्कृती प्रिय असते. त्यामुळे सांस्कृतिक-धार्मिक पर्यटनाचा विकास होतो, भारतासारख्या राष्ट्रामध्ये धार्मिक पर्यटन हे अधिक प्रमाणात असलेले दिसते,भारतात २ लाखाच्या वर मंदिरे ,३ लाख मशिदी, १०,७०१ चर्च हे अस्तित्वात असलेले दिसतात, शिवाय इतर धर्माशी निगडित, हजारो ठिकाणे असलेली दिसतात, ज्यातून लक्षावधी यात्रा,उरूस,मिरवणुका निघत असलेल्या कळतील, शिवाय विविध धर्मामध्ये असलेल्या विविध प्रथांमुळे देखील लक्षावधी वस्तूंची विक्री होत असलेली दिसून येते, ज्यामुळे साधारण लोकांना रोजगाराची संधी निर्माण झालेली दिसते. कित्येक भागातून तीर्थयात्रा करायला लोक निघतात,कित्येक लोक उरूस-जत्रा करतात, चार धाम यात्रा असते, शिवाय सणासुदीच्या दिवशी लोकांची अशा स्थळांवर जास्त रेलचेल होते, ज्यातून परिवहनाला देखील चालना मिळते, लोकांचे भ्रमंती करून मनोरंजन होते शिवाय समाधान देखील मिळते, म्हणून धार्मिक पर्यटन देखील पर्यटन विकासात महत्वाचे योगदान देत असलेले दिसून येते.
===प
र्यावरण पर्यटन===
आरोग्य पर्यटनात पर्यटक आल्हाददायक स्वच्छ हवामानात आपल्या प्रकृतीत सुधारणा करण्यासाठी अथवा आहे तशीच ठेवण्याचा प्रयत्न करतो. पूर्वी यालाच हवापालट असे म्हणत. लोकमान्य टिळक अशाच कारणासाठी सिंहगडावर जाऊन रहात.
प्रदूषणमुक्त व आल्हाददायक वातावरण व जोडीला निसर्गसौंदर्य असल्यास आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो, म्हणूनच स्थानिक पर्यटनात पर्यटक जवळच्या शांत निसर्ग संपन्न व सौंदर्याने नटलेल्या परिसरात हवापालटासाठी जातात. अशा पर्यटनात पर्यटक एका आठवड्यापासून ते तीन महिन्यापर्यंत वास्तव्य करतात. उदा० महाबळेश्वर, माथेरान, चिखलदरा, वाई, पाचगणी, इत्यादी गावी जाऊन राहणे.
शैक्षणिक पर्यटन म्हणजे अभ्यासाच्या दृष्टीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी केलेला प्रवास होय.यामध्ये शैक्षणिक सहली,शैक्षणिक परिषद किंवा संशोधनासाठी देशामध्ये किंवा देशाबाहेर केलेला प्रवास यांचा समावेश होतो.विद्यार्थ्यांच्या दृष्टीने या पर्यटनाला जास्त महत्त्व आहे कारण क्षेत्र अभ्यास केल्यामुळे वेगवेगळ्या संकल्पना समजण्यास मदत होते.
एकल पर्यटन ही संकल्पना पश्चिमात्य देशात लोकप्रिय आहे.एकट्याने थोडक्या साहित्यानिशी पर्यटनाला बाहेर पडणे,पर्यटनाचे नियोजन करून अथवा न करता लवचिक धोरणानुसार ठिकठिकाणी पर्यटन करणे.ही प्रमुख संकल्पना या मागे असते.शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी किंवा व्यवसाय करण्या आधी काही काळाचा विश्राम घेऊन तरुण-तरुणी एकट्याने पर्यटनासाठी बाहेर पडतात.या मध्ये अनेक भले-बुरे अनुभव येतात,व जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन विस्तृत होतो.भारतातही हल्ली या प्रकारचे पर्यटन करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.
राजस्थान मधील पर्यटन Archived 2020-10-07 at the Wayback Machine.==बाह्य दुवे==
This article uses material from the Wikipedia मराठी article पर्यटन, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.