चाणक्य (इतर नावे: विष्णूगुप्त, कौटिल्य) (कालमान: अनुमाने इ.स.पू.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
३५०">इ.स.पू. ३५०च्या सुमारास) हा सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या राजसभेत महामंत्री होता. अत्याचारी नंद घराणेशाहीची राजवट संपवून सम्राट चंद्रगुप्ताला सिंहासनावर बसवण्यात त्याचाच मुख्य सहभाग होता असे मानले जाते. तसेच त्याने रचलेला कौटिलीय अर्थशास्त्र हा ग्रंथ भारतीय संस्कृतीतील एक दैदीप्यमान ग्रंथ मानला जातो. २५ प्रकरणे व सहा हजार श्लोक असलेला हा ग्रंथ अर्थशास्त्र व राजनीतीवर लिहिलेला मानवी इतिहासातील पहिला ग्रंथ असल्याचे मानले जाते. या ग्रंथात प्रतिपादलेल्या धोरणास 'चाणक्यनीती' वा 'दंडनीती' म्हणून ओळखतात. प्राचीन संस्कृत भाषेत फारच थोडे लिखाण गद्यात आढळते. कौटिलीय अर्थशास्त्र हा अशा मोजक्या गद्य संस्कृत साहित्यातील एक ग्रंथ आहे. चाणक्याच्या लेखनाचा परिणाम त्याकाळी व त्यानंतर रचलेल्या अनेक ग्रंथांवर झालेला आढळतो. उदाहरणार्थ, योगेश्वर याज्ञवल्क्याने लिहिलेली याज्ञवल्क्य स्मृती व वात्सायनाने लिहिलेले कामसूत्र हे ग्रंथ. पंचतंत्र या विख्यात ग्रंथाचा कर्तादेखील ततो धर्मशास्त्राणि मन्वादीनि, अर्थशास्त्राणि चाणक्यादीनि, कामशास्त्राणि वात्स्यायदीनि या श्लोकातून अर्थशास्त्राचे महत्त्व मान्य करतो.
चाणक्याच्या प्रारंभिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी विख्यात आहेत. सर्वांत प्रचलित कथेनुसार चाणक्य किंवा विष्णूगुप्त हा पाटलीपुत्रमधील 'चणक' या प्रतिभावंत शिक्षकाचा मुलगा होता. नंद राजवटीवर टीका केल्याने राजद्रोहाबद्दल चणक यांना अटक झाली व त्यांचा कारावासात मृृत्यू झाला. पाटलीपुत्र शहरात नंद राजवटीत चणक कुटुंबाचे जगणे असाह्य झाल्याने विष्णूगुप्ताने तक्षशिलेला प्रस्थान केले. तक्षशिला येथील विद्यापीठात शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने तक्षशिला विद्यापीठातच राजकारण व अर्थशास्त्र या विषयांवर अध्यापन चालू केले व अत्यंत प्रभावी शिक्षक म्हणून आपली ओळख निर्माण केली. राजकारण व आर्थशास्त्र हे विषय शिकवत असल्याने भारतातील अनेक राज्यांचे मंत्री चाणक्यांच्या मार्गदर्शनाखाली सज्ज झाले. त्यामुळे कोणत्याही राज्याशी निगडित नसूनही चाणक्याचे नाव भारताच्या राजकीय वर्तुळात सन्माने घेतले जात होते. कैकेय देशाचा महामंत्री इंद्रदत्त हा चाणक्याचा मित्र होता, असे मानतात. लहानपणापासूनच नंद राजवट उलथून टाकण्याचे स्वप्न विष्णूगुप्ताने मनात बाळगले होते. त्यादृष्टीने सज्जता म्हणून त्याने आपले शिष्य सज्ज केले होते, त्यांत चंद्रगुप्त मौर्य सुद्धा होता. त्याला चाणक्याने मगध देशाचा राजा बनविला.
अलेक्झांडरचे भारतावरील हल्ला चाणक्याच्या आयुष्यात मोठी उलाढाल करून गेले. अलेक्झांडरच्या हल्लेला सामोरे जाणे केवळ भारतीय राज्यांची एकत्र सेनाच करू शकेल असा विश्वास विष्णूगुप्ताला होता, त्यामुळे चाणक्याने विविध राज्यांच्या राज्यकर्त्यांना एकत्र लढण्याचे आवाहन केले. पण सुरुवातीलाच तक्षशिलेचा राजकुमार आंभी याने अलेक्झांडरकडे मैत्रीचा हात पुढे केला. पण वेगवेगळ्या राज्यांचे व जनपदांचे एकमेकांशी हेवेदावे व संघर्षांमध्ये अडकलेल्या राज्यांना एकत्र करून अलेक्झांडरविरुद्ध लढण्यासाठी प्रेरित करण्यात चाणक्यला अपयश आले. याउलट आंभीने अलेक्झांडरबरोबर युती करून पोरसविरुद्ध लढण्यास साह्यत्ता केली. पोरस ने अलेक्झांडरचा झेलम नदीच्या काठी झालेल्या लढाईत पराभव केला. चाणक्याने या काळात मगध साम्राज्यालाही अलेक्झांडरविरुद्ध इतर राज्याशी युती करून लढण्यास विनंती केली व भारताला पारतंत्र्यापासून वाचवण्याचा आग्रह धरला. पण चाणक्याचा अपमान करून त्याची विनंती धुडकावून लावण्यात आली. जोपर्यंत या अपमानाचा सूड घेणार नाही तोपर्यंत आपली शेंडी बांधणार नाही अशी चाणक्याने प्रतिज्ञा घेतली होती अशी कथा विख्यात आहे. अलेक्झांडरच्या सैन्यामध्ये इतर भारतीय राज्यांच्या सामर्थ्याबद्दलच्या कथा ऐकून त्याच्या सैन्यामध्ये दुफळी माजली व परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी त्याने मॅसेडोनियाला परतण्याचा निर्णय घेतला व काही काळातच अलेक्झांडरने भारतातून माघार घेतली. माघार घेतली तरी जिंकलेला प्रदेश अलेक्झांडरच्या नियंत्रणात रहावा म्हणून या राज्यांवर क्षत्रपांची नेमणूक केली होती त्यामुळे पश्चिम व वायव्य भागावर ग्रीक सत्ताच होती.
तक्षशिलेला परतल्यावर चाणक्याने आपल्या शिष्यांना संघटित करून ग्रीकांविरुद्ध स्वातंत्र्ययुद्धासाठी प्रेरित केले व शिष्यांद्वारे जनजागृतीचे कार्य करून घेतले. चंद्रगुप्तने चाणक्याच्या नियोजनानुसार अनेक लहान सहान लढाऊ जमातींना एकत्र करून ग्रीक छावण्यांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. जनजागृती व चंद्रगुप्तचे यश यामुळे ग्रीकांविरुद्धच्या उपक्रमाला व्यापक चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. चाणक्यच्या नियोजनानुसार चंद्रगुप्ताच्या सैनिकांद्वारे ग्रीक सैन्यातील केवळ ग्रीकांवर हल्ले करण्यात येत होते व भारतीयांना जीवदान देण्यात येत होते. यामुळे ग्रीक सैन्यातील भारतीयांची दुग्धा मनोभाविकता झाली. तसेच ग्रीक सैनिकांचाही विश्वास कमी झाला. यामुळे ग्रीकांसोबत लढणाऱ्या अनेक भारतीय तुकड्यांची सेवेतून हकालपट्टी झाली व ते चंद्रगुप्ताला येऊन मिळाले. चाणक्याने तक्षशिलेला आपल्या विजयाचे ध्येय बनविले. त्यामुळे आंभीची राजकीय नाचक्की झाली. चंद्रगुप्ताने अनेक प्रांतांमधून ग्रीकांना हुसकावून लावले व ते प्रांत स्वतंत्र घोषित केले. पोरस हा अलेक्झांडरचा अंकित असल्याने युद्धाची झळ त्यालाही बसत होती. पण चाणक्याने पोरसला इंद्रदत्ताद्वारे या संघर्षात बघ्याची भूमिका घेण्यास प्रवृत्त केले त्यामुळे ग्रीकांची लाचारी आणखीन वाढली. चाणक्याच्याच पारंगत धोरणांमुळे सिंध प्रांत सहजपणे पोरसच्या राज्याला जोडला गेला. त्यामुळे पोरसचा चाणक्यांवर विश्वास वाढला. या वाढलेल्या विश्वासावर चाणक्याने पोरसच्या साह्याने मगधवर हल्ला करण्याचे ठरविले.
चाणक्याने त्याच्या अपमानाचा सूड घेण्यासाठी व मगधच्या धनानंद राजाच्या अत्याचारातून प्रजेला सोडविण्यासाठी चंद्रगुप्तास मगध जिंकण्यास पाठविले होते.
This article uses material from the Wikipedia मराठी article चाणक्य, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.