सिंधु देश ही सिंधी लोकांसाठी स्वतंत्र मातृभूमीची कल्पना आहे.
सिंधी राष्ट्रवादी पक्षांनी पाकिस्तानातून स्वतंत्र सिंधी राज्य निर्मितीसाठी प्रयत्न केले आहेत.ही चळवळ पाकिस्तानच्या सिंध प्रांतावर आधारित आहे. सिंध पाकिस्तानात बळजबरीने सामील केल्यापासून ही कल्पना येथे आहे. सिंधू प्रदेश पाकिस्तानात गेला आणि पाकिस्तानच्या चार प्रांतांपैकी एक बनला.
Proposed State | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | political movement | ||
---|---|---|---|
मुख्य विषय | proposed country | ||
स्थान | सिंध, पाकिस्तान | ||
| |||
स्वतंत्र सिंधू देशाची मागणी १९६७ पासून सुरू झाली जेव्हा पाकिस्तान सरकारने तेथील रहिवाशांवर उर्दू भाषा लादली. सिंधी येथील लोकांनी याला विरोध केला आणि परिणामी सिंधी अस्मिता जन्माला आली. स्वातंत्र्योत्तर पाकिस्तानात, पाकिस्तानी राज्याने अवलंबलेल्या धोरणाने सय्यद यांना असा निष्कर्ष काढला की देशात सिंध्यांना योग्य महत्त्व दिले जाणार नाही. तथापि बांगलादेशच्या स्वातंत्र्यानंतर सिंधी राजकीय नेते यांनी ही कल्पना जास्त प्रबळ झाली. त्यांनी सिंधी राष्ट्रवादाला नवी दिशा दिली, १९७२ मध्ये जय सिंध तहरीकची स्थापना केली आहे. सिंधू देशाचे समर्थक असा युक्तिवाद करतात की सिंधू क्षेत्र हे सिंधू संस्कृतीचे केंद्र आहे, जे ब्रिटिशांनी बेकायदेशीरपणे कब्जा केले. कोणत्याही सिंधी राष्ट्रवादी पक्षाला सरकारच्या कोणत्याही स्तरावर सिंधमध्ये कधीही सत्तेवर आणले गेले नाही. काही राष्ट्रवादी पक्ष आणि संघटनांवर पाकिस्तानी सरकारने "दहशतवादी, राज्यविरोधी आणि तोडफोड" कार्यांसाठी बंदी घातली आहे. सिंधुदेश या संकल्पनेला बहुतांश भारतातील सिंधी लोक पाठिंबा देतात. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या मृत्यूनंतर सिंधुदेश चळवळीची लोकप्रियता वाढली. सिंधू देश लिबरेशन आर्मी किंवा SDLA पाकिस्तान सिंध प्रांत आधारित एक स्वातंत्र्यवादी गट आहे. जय सिंध कौमी महाज हे जय सिंध किंवा सिंधुदेश चळवळीतील सर्व राष्ट्रवादी गटांचे "विलीनीकरण/एकीकरण" आहे. ज्यू समाजाने इस्रायल नावाचा त्यांचा स्वतःचा देश निर्माण केला आहे, त्याचप्रमाणे सिंधींना पाकिस्तानमध्ये निश्चित प्रदेशात स्वतःसाठी एक स्वतंत्र आणि सार्वभौम मातृभूमी हवी आहे.
१७ जानेवारी २०२१ रोजी पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील सान शहरात सिंधू देशाच्या मागणीच्या समर्थनार्थ एक विशाल रॅली काढण्यात आली आणि सिंधू देशासाठी जगातील नेत्यांकडून समर्थनाची मागणी केली. सिंधींचा आरोप आहे. की पाकिस्तान त्यांचा वापर फक्त त्यांच्या नैसर्गिक संसाधनांसाठी करतो. सिंधमधील एकमेव राजकीय कुटुंब पाकिस्तानच्या सत्तेवर राज्य करू शकले आहे, ते कुटुंब भुट्टो कुटुंब आहे. बेनझीर भुट्टो सत्तेत असताना ही चळवळ दडपली गेली, पण भुट्टोच्या मृत्यूनंतर ही ठिणगी पुन्हा भडकली. पाकिस्तानमधील अनेक पक्ष स्वतंत्र सिंधू देशासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे काम करत आहेत. यामध्ये जी सिंध कौमी महाज पार्टी, जी सिंध मत्तहिदा महाज, जी सिंध स्टुडंट फेडरेशन, सिंध नॅशनल मूव्हमेंट पार्टी यांचा समावेश आहे.
महाभारत आणि हरिवंश पुराणात उल्लेखित सिंधू हे प्राचीन भारताचे राज्य होते. प्राचीन पाकिस्तानमध्ये सिंधू नदीच्या काठावर हे राज्य आधुनिक पाकिस्तानमध्ये पसरले. याचा उल्लेख बऱ्याचदा सौविर राज्याच्या बाजूने केला जातो. असे मानले जाते की सिंधू राज्याची स्थापना वृषदर्भ, सिवीच्या मुलांपैकी एक, यांनी केली होती. मिरचंदानी यांनी लिहिलेल्या ‘ग्लिम्प्सेस ऑफ एन्शंट सिंध’च्या मते सिंधू राज्याची राजधानी वृषदर्भपूर म्हणून ओळखली जात होती, आणि तुळसियानीस, ज्याला नंतर सिंधू म्हणून ओळखले जात असे, ते सध्याच्या दक्षिण पंजाबमधील मिठाणकोट शहरामध्ये किंवा त्याजवळ होते. या राज्यांतील रहिवाशांना सिंधू किंवा सैंधव असे म्हणतात. ‘सिंधू’ याचा अर्थ "नदी" आणि "समुद्र" आहे. महाभारत या महाकाव्यानुसार जयद्रथ (दुर्योधनाच्या बहिणीचा नवरा) सिंधू, सौवीर आणि शिब्यांचा राजा होता. बहुधा सौवीर आणि शिबी ही दोन राज्ये सिंधू राज्याच्या जवळ होती आणि जयद्रथाने त्यांना जिंकून काही काळ टिकवून ठेवले होते.
सिंधू (भोज, सिंधू, पुलिंदक) यांना (६:९) येथे भारत वर्षाचे स्वतंत्र राज्य म्हणून संबोधले जाते. तसेच कासमिर, सिंधू सौविर, गांधार (किंवा गंधर्व) यांचा भारतवर्षाची राज्ये म्हणून उल्लेख आहे. महाभारत - (५:१९), (६:५१), (६:५६), (७:१०७), (८:४०) आणि (११:२२) यासह बऱ्याच ठिकाणी सिंधू आणि सौवीर यांचा संयुक्त राज्य म्हणून उल्लेख आहे.
दानशूर कर्णाच्या मते, सांस्कृतिकदृष्ट्या, प्रस्थळ, माद्र, गांधार, आरत्त, खासा, वसति, सिंधू आणि सौविर, हे जवळपास त्यांच्या कार्यपद्धतींमध्ये दोषीच आहेत - (८:४४). “वाहिकं, पुण्यकर्माच्या बाहेर गेलेले आणि हिमवत्, गंगा, सरस्वती, यमुना, कुरुक्षेत्र आणि सिंधू आणि तिच्या पाच उपनदीपासून दूर राहणारे अपवित्र लोक टाळले पाहिजेत.” - महाभारत =(८:४४).
“गंधार (किंवा गंधर्व), सिंधू आणि सौवीर त्यांच्या खिळ्यांनी आणि भाल्यांनी उत्तम लढा देतात. ते शौर्य आणि सामर्थ्याने संपन्न आहेत. त्यांचे सैन्य सर्व शक्तींचा नाश करण्यास सक्षम आहे. उसिनरांकडे बरीच शक्ती आहे आणि सर्व प्रकारच्या शस्त्रांमध्ये कुशल आहेत. पूर्वेतील लोक युद्धात हत्तीच्या पाठीवरून लढण्यात कुशल आहेत व त्यांनी सर्व प्रकारच्या अन्यायकारक युद्धांचा समाचार घेतला आहे. यवन, कंबोज आणि मथुरेच्या सभोवताल राहणारे लोक केवळ शस्त्रे घेऊन लढायला कुशल आहेत. दक्षिणेतील लोक हातातल्या तलवारीने लढण्यास कुशल आहेत.” - महाभारत - (१२:१००)
This article uses material from the Wikipedia मराठी article सिंधु देश, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.