तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी (जानेवारी २७, १९०१ - मे २७, १९९४) हे मराठी लेखक, कोशकार व सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक-संशोधक होते.
१९०१">१९०१ - मे २७, १९९४) हे मराठी लेखक, कोशकार व सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक-संशोधक होते.
जोशींचा जन्म धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे आणि शिक्षण वाई येथील प्राज्ञ पाठशाळेत झाले. लहानवयात मधुकरी मागून त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता. त्याकरिता इ.स. १९३२ साली त्यांना तुरुंगात जावे लागले.
संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते हिंदू धर्माचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत इत्यादी शास्त्रांवर ते अधिकारवाणीने बोलू शकत. हिंदू तत्त्वज्ञान त्यांनी चांगल्या प्रकारे अवगत केले होते.वाराणसी येथे जाऊन जोशी यांनी तर्कशास्त्राचे अध्ययन पूर्ण केले. त्यांनी तर्कतीर्थ ही उपाधी प्राप्त केली.
अस्पृश्यता निवारण, विधवांचे पुनर्विवाह, अशा सामाजिक प्रश्नांवर जोशी यांनी काम केले. महात्मा गांधी यांच्या अस्पृश्यता निवारण चळवळीत त्यांचे वैचारिक योगदान होते.
This article uses material from the Wikipedia मराठी article लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.