समुद्रगुप्त ( इस.
३३५ ते ३८०) हा या हिंदू गुप्त साम्राज्याचे प्रभावी सम्राट व भारताच्या इतिहासातील महान सेनानी होते. समुद्रगुप्त हे नाव त्यांनी पार पाडलेल्या लष्करी मोहिमांमुळे पडले होते व त्यांनी गुप्त साम्राज्याच्या सीमा तत्कालीन भारताच्या सागरापर्यंत नेऊन ठेवल्या होत्या. त्यांचे जन्मस्थान इंद्रप्रस्थ होते. त्यांच्या पत्नीचे नाव दत्ता देवी असे होते. समुद्रगुप्त यांनाअनेक ज्येष्ठ बंधू असले तरी समुद्रगुप्त यांची सम्राट बनण्याची पात्रता इतरांपेक्षा जास्त होती, म्हणून पहिल्या सम्राट चंद्रगुप्तानंतर समुद्रगुप्त सम्राट बनले. गुप्त कालखंडाला भारताचा सुवर्णयुग देखील म्हटले जाते कारण याच काळात देशाने गणित, खगोलशास्त्र, विज्ञान इत्यादी क्षेत्रात खूप वेगाने विकास केला.
समुद्रगुप्ताबद्दल माहिती प्रयागराज येथील शिलास्तंभांवरून मिळते. हे स्तंभ त्यांच्या कार्यकालात उभारले होते. त्यात समुद्रगुप्तांच्या विविध मोहिमांचा दाखला आहे. हे शिलालेख तत्कालीन भारताची राजकीय स्थिती दर्शवतात, कारण विविध राजे, राज्ये व त्यात राहणाऱ्या लोकांचा त्यांत उल्लेख आहे. ज्याला प्रयाग प्रशस्ती म्हणूनही ओळखले जाते
समुद्रगुप्ताची विविध प्रकारची नाणी आहेत. त्यांवर परशू ,गरुड ,धनुर्धर, अश्वमेध,व्याघ्रहनन, वीणावादन इत्यादी चित्रे आहेत. व्याघ्रहनन या प्रकारच्या नाण्यावर समुद्रगुप्त: हे नाव कोरलेले आहे. सम्राट समुद्रगुप्ताने जारी केलेल्या नाण्यांवरून आणि शिलालेखांवरून बरेच काही ज्ञात झाले आहे. त्यांची आठ वेगवेगळ्या प्रकारची नाणी होती आणि ते सर्व शुद्ध सोन्याची बनवलेली असत. सम्राट समुद्रगुप्त गुप्त हे जगातल्या चलनव्यवस्थेचे जनक आहेत. त्यांनी विविध प्रकारची नाणी सुरू केली.
समुद्रगुप्ताने आपले अधिराज्य पाच क्षेत्रांमध्ये गाजविले होते.१) उत्तरेला हिमालय- नेपाळपर्यंत, २) दक्षिणेला कांचीपुरमपर्यंत, ३) पूर्वेला ब्रह्मपुत्रा नदी- आसाम, बंगालपर्यंत ४) पश्चिमेला रावी नदी- पंजाबपर्यंत, ५) आणि मध्य भागात, मध्य भारत ते विंध्यपर्यंत. समद्रगुप्त हे सर्व आपल्या लष्करी शक्तीची तयारी दाखवून देण्यासाठी करत असे. रावी नदी- पंजाबपर्यंत होते. समुद्रगुप्त राज्याची राजधानी पाटलीपुत्र होती.
मोठमोठे युद्ध जिंकल्यानंतर त्यांनी अश्वमेध यज्ञ (घोडा यज्ञ) आयोजित केला. प्रशस्ति समुद्रगुप्त यांचे राजकवी कवि हरिषेण रचित स्तूती मध्ये त्यांचे अखंड भारत तयार करण्याचे भव्य कार्य दिसून येते.
तो हिंदू धर्माचा आश्रयदाता होता. समुद्रगुप्ताने सुमारे ४० वर्षे राज्य केले. त्यांना भारतीय संगीताची खूप आवड होती. अनेक नाण्यांमध्ये सम्राट समुद्रगुप्त वीणा वाजवताना दिसतात. त्यांनी हिंदू धर्म, साहित्य, कला इत्यादींचा प्रचार केला. सम्राट समुद्रगुप्त यांना विविध पदव्या दिलेल्या आहेत् आणि ते या नावांनीही काव्यात ओळखले जातात.
क सक्षम आणि दयाळू शासक म्हणून चित्रित केले गेले, ज्याने आपल्या प्रजेच्या, विशेषतः गरीब आणि निराधारांच्या कल्याणासाठी खूप काळजी घेतली. त्यांनी श्रीलंकेच्या राजाला बोधगया येथे श्रीलंकेच्या यात्रेकरूंसाठी बौद्ध मठ आणि विश्रामगृह बांधण्याची परवानगी दिली. समुद्रगुप्त युद्धाइतकाच शांततेच्या कलांनाही समर्पित होता. ते एक उत्तम संगीतकार होते आणि त्यांनी वीणा हे भारतीय तंतुवाद्य वाद्य वाजवले असे दिसते. समुद्रगुप्ताने ४व्या शतकातील प्राचीन भारताच्या बदललेल्या राजकीय आणि आर्थिक परिस्थितीला अनुकूल असलेले विजय आणि शासनाचे मॉडेल तयार केले. त्याने जारी केलेली सोन्याची नाणी त्याच्या काळातील गुप्त साम्राज्याच्या भरभराटीची साक्ष देतात. शासक म्हणून, ते त्यांच्या जोमदार आणि दृढ सरकारसाठी ओळखले जात होते.
विणावादक सम्राट
मागील चंद्रगुप्त पहिला | गुप्त सम्राट ३३५ - ३८० | पुढील चंद्रगुप्त दुसरा |
This article uses material from the Wikipedia मराठी article समुद्रगुप्त, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.