भारताचे उपराष्ट्रपती हे भारत देशामधील राष्ट्रपती खालोखाल दुसऱ्या सर्वोच्च दर्जाचे संवैधानिक पद आहे.
भारताच्या संविधानामधील ६३व्या कलमानुसार हे पद अस्तित्वात आहे. पदावर असताना राष्ट्रपतीचा मृत्यू, राजीनामा, अभियोग अथवा इतर कारणांस्तव राष्ट्रपतीपद रिकामे झाल्यास उपराष्ट्रपती ह्या पदाचा कार्यभार सांभाळतो. तसेच संसदेच्या राज्यसभा सदनाचा चेरमन ही देखील कामगिरी उपराष्ट्रपतीवर आहे. ११ ऑगस्ट इ.स. २०२२ रोजी जगदीप धनखड यांची १४ वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली.
भारताचे उपराष्ट्रपती Vice President of India | |
---|---|
निवास | उपराष्ट्रपती भवन |
नियुक्ती कर्ता | भारताचे इलेक्ट्रोरल कॉलेज |
कालावधी | ५ वर्ष |
निर्मिती | १३ मे १९५२ |
पहिले पदधारक | सर्वपल्ली राधाकृष्णन |
वेतन | ₹ ४,००,००० प्रति महिना |
संकेतस्थळ | vicepresidentofindia.nic.in |
- देशाचे पाचवे उपराष्ट्रपती बसप्पा दानप्पा जत्ती ६ महिन्यांसाठी काळजीवाहू राष्ट्रपती झाले. मात्र, राष्ट्रपतीपदी त्यांची निवड होऊ शकली नाही. - सन १९५८मध्ये ते म्हैसूर राज्याचे मुख्यमंत्री होते. १९७२मध्ये ते ओरिसा राज्याचे गव्हर्नर झाले.
- जस्टिस हिदायतुल्ला देशाचे ६ वे उपराष्ट्रपती होते. यासोबतच ते देशाचे काळजीवाहू राष्ट्रपतीसुद्धा होते. मात्र, राष्ट्रपती होऊ शकले नाही. - प्रथम २० जुलै १९६९ ते २४ ऑगस्ट १९६९पर्यंत ते काळजीवाहू राष्ट्रपती होते. डॉ. झाकीर हुसेन यांचे निधन आणि राष्ट्रपती निवडणूक लढवण्यासाठी व्ही.व्ही. गिरी यांनी उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा देणे या कारणांमुळे त्यांना ही जबाबदारी देण्यात आली होती. - दुसऱ्यांदा जस्टिस हिदायतुल्ला यांना ६ ऑक्टोबर १९८२ ते ३१डिसेंबर १९८२पर्यंत काळजीवाहू राष्ट्रपती करण्यात आले. त्यावेळी ज्ञानी झैलसिंग अमेरिकेला उपचारासाठी गेले होते.
- कृष्णकांत देशाचे १०वे उपराष्ट्रपती होते. आपल्या पदावरून निवृत्त होण्यापूर्वी २००२मध्ये त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. - तत्पूर्वी ते आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूचे राज्यपाल होते. - ते बनारस हिंदू विद्यापीठाचे एमएससी होते.
- 'राजस्थानाचे एकच सिंह' या नावाने ते ओळखले जात होते. भैरो सिंह शेखावत यांनी १९५२मध्ये राजकारणात पाऊल ठेवले. - १९५२, १९५७, १९६२ आणि १९६७मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले. यानंतर १९७२मध्ये निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांना १९७३मध्ये राज्यसभेवर पाठवण्यात आले. - आणीबाणीच्या काळात शेखावत यांना तुरुंगात सुद्धा जावे लागले होते.
- १९७७मध्ये त्यांनी राजस्थानातून निवडणूक जिंकून पहिल्यांदाच बिग काँग्रेसी मुख्यमंत्री पद मिळवले. यानंतर 1980 मध्ये त्यांचे सरकार विरोधकांकडून पाडण्यात आले. - यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला आणि राजस्थानच्या निवडणुकीत भाजपला मोठा जनधिकार मिळाला. शेखावत पुन्हा आमदार म्हणून निवडून आले. - यानंतर शेखावत १९९० ते १९९२ आणि पुन्हा १९९३ ते १९९८पर्यंत राजस्थानचे मुख्यमंत्री झाले. - २००७मध्ये त्यांना मोठ्या बहुमताने उपराष्ट्रपती करण्यात आले.
- भारताचे १२वे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी सलग दोनवेळा या पदावर निवडण्यात आले होते. अशा प्रकारे निवडून येणारे ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यानंतरचे पहिलेच उपराष्ट्रपती ठरले. - अन्सारी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९६१मध्ये इंडियन फॉरेन सर्व्हिसेसने केली. यानंतर ते युनोमध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणून गेले. - १९८४मध्ये हमीद अन्सारी यांना पद्मश्री देण्यात आला. यानंतर ते अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू झाले.
This article uses material from the Wikipedia मराठी article भारताचे उपराष्ट्रपती, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.