भारतीय लष्कराचा पायदळ विभाग हा भारतीय सशस्त्र सेनेचा एक मोठा घटक आहे.
भारताचे राष्ट्रपती हे भारतीय लष्कराचे सरसेनापती आहेत आणि लष्करप्रमुख सेनेचं संपूर्ण नियंत्रण करतात. फिल्ड मार्शल ही पंचतारांकित सन्माननीय पदवी लष्करप्रमुख पदापेक्षा वरचढ आहे आणि ती आतापर्यंत दोनच अधिकाऱ्यांना मिळाली आहे. भारतीय सेना ही स्वातंत्र्यापूर्वी ईस्ट इंडिया कंपनीचे लष्कर (Armies of the East India Company) व नंतर ब्रिटिश भारतीय लष्कर (British Indian Army) म्हणून ओळखले जायचे. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच लष्कराच्या प्रत्येक रेजिमेंटला समृद्ध असा इतिहास आहे आणि प्रत्येक रेजिमेंटने अनेक युद्धात भाग घेऊन यथोचित सन्मान मिळवले आहेत.
भारतीय लष्कर | |
स्थापना | ऑगस्ट १५, इ.स. १९४७ |
देश | भारत |
विभाग | पायदळ |
आकार | १,३२५,००० सशस्त्र पायदळ |
ब्रीदवाक्य | सेवा परमो धर्मः |
रंग संगती | {{color box|#000000}} |
मुख्यालय | नवी दिल्ली |
सेनापती | जनरल मनोज मुकुंद नरवणे |
संकेतस्थळ | http://indianarmy.nic.in/ indianarmy.nic.in |
राष्ट्रीय सुरक्षा व एकता अबाधित ठेवणे, परकीय तसेच अंतर्गत आक्रमणांपासून देशाचे रक्षण करणे, सीमेवर सुरक्षा व शांतता कायम ठेवणे ही भारतीय लष्कराची प्रमुख कर्तव्य आहेत. भारतीय लष्कर नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सुद्धा नागरिकांच्या मदतीला धावून जाते. भारतीय लष्कराने पाकिस्तान,चीन यासारख्या शेजारील देशांसोबत केलेल्या युद्धप्रमाणेच ऑपरेशन विजय, ऑपरेशन मेघदूत यासारख्या अंतर्गत मोहिमाही आखल्या आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेचा भाग म्हणून अनेक देशांमध्ये भारतीय लष्कराने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
भारतीय लष्करात वेगवेगळ्या रेजिमेंट्स असल्या तरीही भौगोलिक व व्यावहारिकदृष्ट्या लष्कराचे सात कमांड्स आहे. भारतीय पायदळात १३,२५,००० नियमित सैनिक व ११,५५,००० राखीव सैनिक आहेत. भारतीय लष्कर हे जगातील एक मोठे सैन्य आहे. भारतीय लष्कर आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, आधुनिक शस्त्रास्त्रे यांचा सतत अभ्यास व वापर करून स्वतःला सक्षम बनवत आहे.
१९४७ला देश स्वातंत्र्य झाल्यानंतर ब्रिटिश भारतीय सेनाला नवीन राष्ट्र भारत और इस्लामी गणराष्ट्र पाकिस्तान सेवा करण्यासाठी २ भागात वाटले. चार गोरखा सैन्य दलाला ब्रिटिश सेना मध्ये स्थानांतरित केल. पहिले जागतिक युद्ध इ.स. १९१४ ते१९१८ या काळात झाले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
भारत-पाकिस्तान पहिले युद्ध इ.स. १९४७ला सुरू झाले. ब्रिटिशांच्या राजवटीत भारतात जम्मू आणि काश्मीर हे वंशपरंपरागत राजेशाही असलेले एक संस्थान होते भारत आणि पाकिस्तानला स्वातंत्र्य जाहीर करताना ब्रिटिशांनी तत्कालीन संस्थानांच्या त्यांच्या भारत किंवा पाकिस्तान मध्ये सहभागी होण्याचा पर्याय दिला होता.मात्र भारतीय स्वातंत्र्यानंतर लगेचच ऑक्टोबर 1947 मध्ये पाकिस्तानने जम्मू-काश्मीर वर हल्ला चढवला त्याविरोधात महाराजा हरीसिंग यांनी भारताची मदत मागितली.भारतात जम्मू-काश्मीर विलीन करण्याचा करण्याच्या करारावर त्यांनी स्वाक्षरी केली.भारताने तातडीने आपले सैन्य श्रीनगरला पाठवले.या सैन्याने पाकिस्तानचा पाठिंबा असलेल्या हरामखोरांना रोखून धरले आणि प्रति चढाई सुरू केली अशा रीतीने भारत आणि पाकिस्तान दरम्यान पहिले युद्ध झाली 1948मध्ये युद्धबंदी होऊन हा संघर्ष थांबला त्या वेळी पाकिस्तानच्या ताब्यात जम्मू-काश्मीरचा एक तृतीयांश भाग राहिला त्याला पाकव्याप्त काश्मीर असे संबोधले जाते.
हैदराबाद पोलीस कारवाई
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
गोवा मुक्तिसंग्राम
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
भारत आणि चीन यांच्यामध्ये इ.स. १९६२ मध्ये युद्ध झाले. ब्रिटिशांच्या काळात इ.स. १९१४ मध्ये झालेल्या शिमला करार आत्मीयता आणि तिबेट दरम्यान सीमा निश्चित करण्यात आली. त्यात ब्रिटिश पथकाचे नेतृत्व करणाऱ्या सर हेन्री मॅकमोहन यांच्या नावानेही मॅकमोहन रेषा सीमारेषा म्हणून ओळखली जाते मात्र ही सीमा रेषा मान्य नसून किंवा अरुणाचल प्रदेश यांचा भाग असल्याचा चीनचा दावा हे अधिकारी या प्रदेशाचे वर्णन दक्षिण असे करतात. इ.स. १९६५ च्या युद्धात चीनचे सैन्य मॅकमोहन रेषा ओलांडून अरुणाचल प्रदेशात घुसली तसेच पश्चिम क्षेत्रात त्यांनी अक्साई चीनचा ताबा घेतला त्यानंतर ठेवला मात्र पूर्व क्षेत्रात म्हणून मी मागे घेतली. इ.स. १९६७ मध्ये भारत-चीन संघर्ष झाला तुला खिंडीच्या परिसरातील भारतीय लष्कराच्या चौक यावर चिनी हल्ले चढवले मात्र भारतीय सैन्याने त्यांचा जोरदार प्रतिकार केला आणि चीनने या भागात केली मोर्चेबांधणी उद्ध्वस्त केली
भारत आणि पाकिस्तान दरम्यान 1965 मध्ये दुसरे युद्ध झाले मी 1965 मध्ये कच्छच्या रणात पहारा देणाऱ्या भारतीय जवानांना शत्रुसैन्याच्या संशयास्पद हालचाली आढळल्यास व त्यावरून चकमक उडाली पाकिस्तानी सप्टेंबर 1965 मध्ये या संघर्षाची व्याप्ती वाढवून काश्मीरमध्ये स्थानिकांच्या वेशात सैनिक घुसवली भारताने त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले संयुक्त राष्ट्रसंघाच्या मध्यस्थीने युद्धबंदी होऊन हा संघर्ष थांबला त्यानंतर 19 66 मध्ये तत्कालीन सोव्हिएत युनियनमधील ताश्कंद येथे दोन्ही देशांनी शांतता करारावर स्वाक्षरी केली
भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे तिसरे युद्ध १९७१ मध्ये झाली त्याला पूर्व पाकिस्तानात निर्माण झालेली परिस्थिती कारणीभूत होती पाकिस्तानातील १९७० च्या निवडणुकीत पूर्व पाकिस्तानातील अवामी लिग पक्षाला बहुमत मिळाली परंतु या पक्षाचे नेते शेख मुजीबुर रहमान यांना प्रधानमंत्री बनवण्यास पश्चिम पाकिस्तानातील मध्यवर्ती सरकारने नकार दिला त्यावरून पाकिस्तान मध्ये अंतर्गत संघर्ष उफाळून आला पूर्व पाकिस्तानातील जनतेच्या विरोधात पाकिस्तानी सैन्याने मोठ्या प्रमाणावर अत्याचार सुरू केले ही परिस्थिती चिघळत गेले आणि त्यातून निर्वासितांचे लोंढे भारतात येऊ लागली या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी हवाई दलाने भारताच्या वायव्य सरहद्दीवरील विमानतळावर हल्ले चढवले भारताने त्याला प्रत्युत्तर देताना युद्धाचा भडका उडाला भारतीय सेनेच्या वेगवान व आक्रमक हालचालींमध्ये यामध्ये पाकिस्तानी सैन्य शरण आली या युद्धाची परिणती म्हणून १६ डिसेंबर १९७१ रोजी पूर्व पाकिस्तानच्या जागी स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती झाली युद्धाच्या समाप्तीनंतर १९७२ मध्ये शिमला येथे भारत आणि पाकिस्तान दरम्यान शांतता परिषद झाली
१३ एप्रिल, १९८४ ते ३ जानेवारी, १९८७ सियाचीन हिमनदीचा परिसर हा जगातील सर्वाधिक उंचीवरील युद्धभूमी म्हणून ओळखला जातो हिमनदी लाडक्या उत्तरेला हिमालयातील काराकोरम पर्वत रांगांमध्ये आहे नदीची लांबी अंदाजे 78 किलोमीटर आहे याचीही काराकोरम पर्वत राज्यातील सर्वात मोठी हिमनदी आहे तर जगातील द्रव्य प्रदेशातील दुसरी मोठी हिमनदी आहे हा परिसर समुद्रसपाटीपासून अंदाजे 17700 70 फूट उंचीवर आहे परिसराच्या तव्यावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरू आहे सियाचीन परिसरात 1984 पूर्वी भारत किंवा पाकिस्तान कोणाचे होते भारताच्या मते 1972च्या सिमला करारामध्ये पाकिस्तानचा प्रदेश हा पर्वतरांगा पर्यंत होता मात्र 1984मध्ये पाकिस्तान हा परिसर ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती गुप्तचर मार्फत भारताला मिळाली परंतु पाकिस्तानी हा भागावर कब्जा करण्यापूर्वीच भारतीय लष्कराने ऑपरेशन मेघदूत ही मोहीम राबवून सियाचीन परिसरावर नियंत्रण मिळवले या भागात भारतीय लष्कर सर्वात प्रथम पोहोचले आणि त्यांनी उंचावरील ठिकाणी मोर्चेबांधणी केली पाकिस्तानी सैनिक कमी उंचीवर होती हिमालयाच्या पर्वत राज्यातील ठिकाणी ताब्यात असल्याचा उत्तम लाभ भारताला या ठिकाणी मिळतो
इ.स. १९९९ मध्ये जम्मू-काश्मीरमधील कारगिल क्षेत्रात पाकिस्तानी सैनिकांनी घुसखोरी केली प्रत्यक्ष ताबा रेषेच्या अलीकडे भारतीय हद्दीत अली काही महत्त्वाच्या ठिकाणी त्यांनी बळकावली व तेथे मोर्चेबंदी केली ही घुसखोरी लक्षात आल्यानंतर भारतीय सैन्याने प्रति चढाई करून पाकिस्तानी घुसखोरांना तिथून हुसकावून लावले आणि मूळची प्रत्यक्ष ताबा रेषा पुन्हा प्रस्थापित केली
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
भारतीय सैन्य रेजिमेंटमध्ये विभागलेले असले तरी त्याचे सात व्यावहारिक आणि भौगोलिक विभाग आहेत. अशा प्रत्येक विभागास कमांड असे नाव दिलेले आहे.
वर नमूद केलेल्या फील्ड कॉर्प्सचा आणि Regimental organisationचा गोंधळ होऊ नये. खाली नमूद केलेले कॉर्प्स ही विशिष्ट पॅन-आर्मी कार्ये सोपविलेली कार्यात्मक विभाग आहेत. भारतीय टेरिटोरियल आर्मीकडे वेगवेगळ्या पायदळ रेजिमेंट्सशी संबंधित बटालियन आहेत. आणि काही विभाग युनिट्स जे एकतर इंजिनियर्स, आर्मी मेडिकल कॉर्प्स किंवा आर्मी सर्व्हिस कॉर्प्सचे आहेत. ते अर्धवेळ राखीव म्हणून काम करतात.
Name | Director General | Center |
---|---|---|
आर्मड कोर | The Armoured Corps Centre and School, अहमदनगर | |
रेजिमेंट आर्टीलरी | Lt General P. K. Srivastava, PVSM, AVSM, VSM | The School of Artillery, देवळाली नाशिक |
कोर ऑफ.इ डिफेन्स | Lt General A. P. Singh, | गोपालपुर, ओडिशा. |
आर्मी इव्हिगेशन कोर | Lt General Kanwal Kumar | Combat Army Aviation Training School, नाशिक. |
कोर ॉफ | Lt Gen S.K.Shrivastava,AVSM | College of Military Engineering, PuneMadras Engineer Group, Bangalore Bengal Engineer Group, Roorkee Bombay Engineer Group, खडकी पुणे |
कोर ऑफ सिगंन्लस | Lt General Rajeev Sabheral, AVSM, VSM | Military College of Telecommunication Engineering (MCTE), म्हऊ Two Signal Training Centres at जबलपूर and गोवा. |
मेक्यानिक इन्फन्डी्र | Lt. Gen. R.K. Jagga | अहमदनगर |
Services
Name | Centre |
---|---|
Army Dental Corps | लखनौऊ |
Army Education Corps | पंचम्हारी |
Army Medical Corps | लखनौऊ/पुणे |
Army Ordnance Corps | जबलपूर and सिकंदराबाद (HQ) |
Army Postal Service Corps | काम्ठी नागपूर |
Army Service Corps | बेंगलोर |
Corps of Electronics and Mechanical Engineers | सिकंदराबाद |
Corps of Military Police | बेंगलोर |
Intelligence Corps | पुणे |
Judge Advocate General's Department | Institute of Military Law कामठी, नागपूर |
Military Farms Service | Military Farms School and Centre, Meerut Cantonment |
Military Nursing Service | पुणे and लखनैऊ |
Remount and Veterinary Corps | मिरठ |
Pioneer Corps | बंगळूर |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
This article uses material from the Wikipedia मराठी article भारतीय लष्कर, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.