सम्राट अशोक (इ.स.पू.
२६० – २१८)च्या शिलालेखानुसार, बौद्ध धर्माचा प्रसार त्याच्या काळात खूप दूरवर झाला होता. सत्याचा आणि अहिंसेचा मार्ग दाखवणारे तथागत बुद्ध दिव्य आध्यात्मिक अवस्थांमधील विभूती मानले जातात. जगभरातील कोट्यवधी लोकांनी भगवान बुद्धांनी दिलेल्या अष्टांगिक मार्ग या आठ सिद्धान्तांवर विश्वास ठेवलेला आहे. भगवान बुद्धांच्या मते, धम्म जीवनाचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी,व परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी आणि निर्वाण प्राप्त करण्यासाठी तृष्णा सोडणे आवश्यक आहे. याशिवाय, भगवान बुद्धांनी सर्व संस्कारांना कायमचे वर्ज्य केले आहे. भगवान बुद्धंनी नैतिक संस्थेचा आधार म्हणून मानवाचे वर्णन केले आहे. भगवान बुद्धांनुसार, धम्म म्हणजेच प्रत्येकासाठी ज्ञानाचे दरवाजे उघडणे. त्यांनी असेही सांगितले की विद्वान असणे पुरेसे नाही. विद्वान म्हणजे जो आपल्या ज्ञानाच्या प्रकाशाने सर्वाना प्रकाशित करू शकतो. धम्म लोकांच्या जीवनाशी एकरूप करतो. भगवान बुद्ध म्हणाले की करुणा शील आणि मैत्री हे मानवात आवश्यक गुण आहेत. याव्यतिरिक्त, बुद्धांनी सामाजिक भेदभावही नष्ट करण्याचा प्रयत्न केला. असे सांगितले की कर्मांच्या आधारे, जन्माच्या आधारावर लोकांचे मूल्यांकन करता कामा नये. जगभरात कोट्यवधी लोक भगवान बुद्ध यांनी दर्शविलेला मार्ग अनुसरून आपले जीवन सार्थक करत आहेत.
तथापि, गौतम बुद्ध स्वतःला देव अथवा ईश्वराचा प्रेषित म्हणत नसत.
बौद्ध धर्माचा इतिहास इ.स.पू. ५ व्या शतकापासून आतापर्यंत अस्तित्वात आहे. बौद्ध धर्माचा प्राचीन भारताच्या पूर्वेकडच्या भागात, मगधच्या प्राचीन साम्राज्याच्या (आता बिहार, भारत) आणि त्याच्या आसपास अधिक प्रभाव होता, म्हणून आज प्रचलित असलेल्या सर्वात जुने धर्मांपैकी बौद्ध धर्म महत्त्वपूर्ण धर्म आहे. भारतीय उपखंडाच्या ईशान्येस मध्य, पूर्व आणि आग्नेय आशियातून पसरत विकसित झालेला आहे. एका वेळी किंवा दुसऱ्या वेळी, त्यातील बहुतांश आशियाई खंडांना प्रभावित केले. बौद्ध धर्माचा इतिहास देखील विविध आंदोलनांच्या, बौद्ध शिकवणूक परंपरेतून वैशिष्ट्यपूर्णरित्या विकसित झाला आहे. त्यापैकी थेरवाद, महायान आणि वज्रयान परंपरांचे त्यात बहुमूल्य योगदान आहे.
गौतम बुद्ध (इ.स.पू ५६३ - ४८३) काळात महाजनपदे ही प्रामुख्याने जगभरातून १६ विशाल साम्राज्य तसेच प्रजासत्ताक राज्यात विस्तारलेली होती. तो प्रदेश प्रामुख्याने इंडो-गंगाच्या सुपीक मैदानी प्रदेशात पसरलेला होता, तसेच प्राचीन भारतात दूरवर पसरलेली अनेक छोटी राज्य होती.
सिद्धार्थ गौतम बौद्ध धर्माचे ऐतिहासिक संस्थापक होते. सुरुवातीच्या स्रोतांवरून असे म्हटले आहे की त्यांचा जन्म लहानशा शाक्य प्रजासत्ताक राज्यामध्ये झाला. हा नेपाळमधील कोशल क्षेत्राचा भाग होता. म्हणून त्यांना 'शाक्यमुनी' म्हणूनही ओळखले जाते, ज्याचा शब्दशः अर्थ "शाक्य वंशांचा ऋषी" असा होय. शाक्य राज्य प्रजासत्ताक मुख्यालयांच्या शासनाखाली होते, .
This article uses material from the Wikipedia मराठी article बौद्ध धर्माचा इतिहास, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.