बार्शी' हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.
हा तालुका उस्मानाबाद जिल्हालगत सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असून यास मराठवाड्याचे प्रवेशद्वार असेही म्हटले जाते. येथील वृक्ष संवर्धन समिती,जाणीव फाऊंडेशन, उत्तरेश्वर फाऊंडेशन व उड़ान फाउंडेशनचे कार्य उल्लेखनीय आहे . बार्शी सोलापूर जिल्ह्यातील एक शहर आहे. बार्शी हे शहर कला, क्रीडा, शिक्षण, वैद्यकीय,औद्योगिक, सांस्कृतिक दृष्टीने अत्यंत समृद्ध असे शहर आहे. बार्शी हे मराठवाड्याचे प्रवेशद्वार आहे.
?बार्शी महाराष्ट्र • भारत | |
टोपणनाव: भगवंत नगरी | |
— तालुका — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची | • ३५६ मी |
लोकसंख्या | ३,००,००० (2017) |
भाषा | मराठी |
संसदीय मतदारसंघ | उस्मानाबाद |
तहसील | |
पंचायत समिती | बार्शी |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड | • ४१३४०१,११,२,१० • +०२१८४ • महाराष्ट्र १३(MH13) |
बार्शीची नाट्य परंपरा ही सुद्धा अत्यंत जुनी आहे. अनेक टी.व्ही सिरिअल आणि चित्रपटामध्यही बार्शीच्या कलाकारांनी काम केले आहे. बार्शीचे खारमुरे खूप प्रसिद्ध आहेत. बार्शीमधील जयशंकर मिल ही भारतातील दुसरी सुत गिरणी आहे जी आज पर्यंत चालू आहे. बार्शीतील कॅन्सर हॉस्पिटल हे नावाजलेले हॉस्पिटल असून मुंबई नंतर बार्शीमध्ये अशी दोनच कॅन्सरची हॉस्पिटल एकेकाळी देशामध्ये होती. बार्शीमध्ये 12 ज्योर्तिलिंग आहेत म्हणून बार्शीला बार्शी असे नाव पडले अशी आख्यायेका सांगितली जाते.तसेच ईथे "उत्तरेश्वराचे" देखील मोठे मंदिर आहे त्यास बार्शीचा मोठा "महादेव" म्हणतात तसेच बार्शी हे शिक्षणाचे माहेरघर म्हणतात...
बार्शीच्या निसर्गात वैविध्यता आढळते. बार्शीच्या पश्चिम भागात गवताळ प्रदेश आणि माळरान आहे तर पूर्वेस थोड्याफार प्रमाणात नैसर्गिक जंगल आहे. पावसाळ्यात जुलै महिन्यात पानगाव येथील झोटिंग बाबा मंदिर परिसरातील टेकड्या रंगीबेरंगी फुलांनी बहरून जातात. पर्जन्यमान मध्यम स्वरूपाचे असल्यामुळे हिवाळा चालू झाला की गवत सुकून जायला सुरुवात होते. बार्शीत पाणथळ क्षेत्र, गवताळ प्रदेश, माळरान आणि जंगल यांचे मिश्रण असल्यामुळे येथे जैवविविधता चांगल्या प्रमाणात दिसत होती. पण घटत्या आधिवासामुळे बरेच पशुपक्षी कमी झालेले असल्याचे अभ्यासकांना लक्षात आलेले आहेत. त्यामुळे धाविक पक्षी, शृंगी घुबड, ब्रह्मिनी घर, हरियाल पक्षी, कोल्हा, लांडगा, तरस, रान मांजर पशू पक्ष्यांच्या दिसण्याचे प्रमाण फार कमी झालेले आहे हे लक्षात येते.
बार्शीमध्ये जैन मंदिर हे कुर्डुवाडी रोड येथे आहे.
जुन्या काळी "भगवंताची नगरी" म्हनुन बार्शीची ओळख आढळते. बार्शी हे भगवंत मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. भगवंत मंदिर हे विष्णू देवाचे मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट म्हणजे भारतातील एकमेव विष्णू मंदिर आहे. इ.स. १२४५ साली हेमाडपंथी शैलीने हे मंदिर बांधण्यात आले. तसेच संपूर्ण आशिया खंडातील हेमाड हया पाषाणामधील कोरलेले एकमेव मंदिर आहे. मंदिरास प्रत्येक दिशेने प्रवेशद्वार आहे, मुख्य द्वार पूर्वमुखी आहे. गाभाऱ्यात गरुड़खांब आहे. चैत्र, मार्गशीर्ष, आषाढी व कार्तिकी एकादशीस भक्तगण दर्शनासाठी येतात. आषाढी व कार्तिकी एकादशीस गरुडस्वार भगवंताची मिरवणुक शहरातुन काढली जाते. प्रत्येक पूर्णिमेस छबीना बाहेर नेह्ण्यात येतो. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एका भगवंत भक्ताची समाधी आहे. एकूण 12 महादेवाची मंदिरे असल्यामुळे बार्शी हे नाव पडल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे बार्शी हे लोकप्रिय मानले जाते.
बार्शी शहरापासून २३ कि.मी वर श्री संतनाथ नगरी आहे. ज्याला वैराग असे म्हटले जाते. वैराग हे वैराग्याची भुमी म्हणुन ओळखले जाते. येथे श्री संतनाथ महाराज यांची समाधी आहे. वैरागचा दर बुधवारी बाजार भरतो. वैराग मधील शेळीचा बाजार प्रसिद्ध आहे. वैराग हे ठिकाण आता एक शिक्षणाच्या दष्टीने वाढत आहे. येथे सौ. सुवर्णलता गांधी महाविदयालय, विदयामंदिर कॉलेज असे काही मोठी कॉलेजेस व महाविदयालये आहेत. वैरागमध्ये भोगावती सहकारी साखर कारखाना आहे. बार्शी पासून ८ किलोमीटरवर दडशिंगे गाव आहे. येथे बाळपीर देवाची यात्रा भरते. हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक आहे.
वैराग पासुन १३ कि.मी वर माढा रोडवर तडवळे हे ठिकाण आहे. येथे श्री भगवती मातेचे मंदिर आहे. हे मंदिर भव्य असुन या देवीची अशी कथा सांगितली जाते की या देवीची मुर्ती ही गावातील भोगावती नदीत सापडली असुन ती मुर्ती त्यावेळी तळहाताएवढया आकाराची होती व सध्या ही मुर्ती 5 ते साडे पाच फुट एवढया आकाराची आहे. ही मुर्ती अगदी तुळजापुरच्या देवीप्रमाणे असुन, या देवीची तुळजापुरच्या देवीप्रमाणे पौर्णीमेला यात्रा भरते. पौर्णीमेला पूर्ण गावातुन देवीचा छबिणा काढला जोतो. गावातील भगवती माता ही जागृत देवी असुन गावातील लोकांची गावकऱ्यांची खुप श्रध्दा आहे. भगवती मातेची मिरवणुक ही भव्या असते. गावच्या यात्रेस परगावचे लोग येतात. तडवळे हे गाव भोगावती नदीकाठी असुन, यावली व ढोराळे गावानजीक आहे.
बार्शीमध्ये बी.ए.पी.एस.स्वामीनारायण संप्रदायाचे अत्यंत सुंदर असे श्री. स्वामीनारायण मंदिर बालाजी कॉलोनी, सोलापूर रोड येथे आहे. हे मंदिर व त्यातील मूर्ती अत्यंत आकर्षक आहेत. बालकांना व युवकांना या ठिकाणी संस्कार दिले जातात.
बार्शी शहरापासुन 22 कि.मी.अंतरावर पुणे-लातूर राज्यमार्गावर पांगरी या निमशहरी गावाजवळ जागृत असे निलकंठेश्वर मंदिर आहे. प्रभु रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या निलकंठेश्वर मंदिरात श्रावण महिण्यात व पोर्णिमा,अमावस्या, महाशिवरात्री या दिवशी मोठी यात्रा भरते.
मातृभूमी प्रतिष्ठान, बार्शी नावाची संस्था बार्शीमध्ये कार्यरत असून या प्रतिष्ठान मार्फत विविध योजना राबविल्या जातात. आजाराचे मुख्य कारण दुषित पाणी आहे त्यामुळे शुद्ध पाणी पिणे गरजेचे आहे ही गरज ओळखून प्रतिष्ठानने अनेक गावात आर.ओ.प्लांट बसविलेले आहेत. 3 ते ५ वर्ष वयाच्या मुलांना मोफत तपासणी आरोग्य कार्ड दिली जातात ज्यामध्ये संपूर्ण एक वर्ष ह्या मुलांना बार्शीतील बालरोग तज्ञ डॉक्टर्स मोफत तपासणी करतात. केशर आंब्याची रोपे लावून त्याचे संवर्धन केले आहे. खेड्यामध्ये बसथांबे नसतात ही गरज ओळखून निवारा शेड उभी केलेली आहेत.
मातृभूमी प्रतिष्ठानचा महात्वाकांशी प्रकल्प "अन्नपूर्णा योजना " ज्याद्वारे निराधार, अपंग, वयोवृद्ध लोकांना दोन वेळेचे जेवणाचा डबा घरपोच दिला जातो. सध्या खामगाव,सुर्डी व बार्शी येथे एकूण १८० लाभार्थी याचा लाभ घेत आहेत.
This article uses material from the Wikipedia मराठी article बार्शी, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.