जालियनवाला बाग हत्याकांड

एप्रिल १३, इ.स.

१९१९">इ.स. १९१९ या दिवशी इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर-जनरल रेजिनाल्ड डायर याने अमृतसर येथील जालियनवाला बाग ठिकाणी हे हत्याकांड घडवून आणले. जनरल डायर याच्या हुकुमावरून लष्कराने निशस्त्र लोकांच्या सभेवर रायफलींच्या १,६०० फैरी झाडल्या. या सभेत स्त्रिया आणि पुरूषांसोबत लहान मुलांचाही समावेश होता. अधिकृत सूत्रांच्या हवाल्यातून या हत्याकांडामधे 400 लोकांचा मृत्यू झाला. अनाधिकृत सूत्रांनुसार मृतांचा आकडा १,०००हून अधिक आहे.

जालियनवाला बाग हत्याकांड
जालियनवाला बाग हत्याकांड

जालियनवाला बाग सभा

अमृतसर अखंड भारतातील पंजाब राज्यातील एक महत्त्वाचे शहर होते. एप्रिल १० १९१९, रोजी सकाळी एक घोळका अमृतसरच्या डेप्युटी कमिशनरच्या घराकडे जात होता. कारण होते दोन प्रसिद्ध स्वातंत्र्यवीरांच्या सुटकेच्या मागणी, सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलु, असे २ वीर ज्यांच्या विरुद्ध तडीपार करण्याचा आदेश जारी करण्यात आला होता. ह्या घोळ्क्यावर सैन्याच्या एका तुकडीने बेछूट गोळीबार केला. त्याचे पडसाद त्याच दिवशी उमटले. ब्रिटिश सरकारच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्याऱ्या ईमारतींना आग लावण्यात आली. टाउन हॉल, दोन बँकाच्या इमारती, तारघर, रेल्वेचे गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. गुरखा रेजीमेंटने रेल्वे स्थानकाचा बचाव केला. रेल्वे गोदामाचा एक युरोपीयन रक्षकाला जोरदार मारहाण करण्यात आली, तीन बँक कर्मचारी आगीत ठार झाले, तर एका युरोपीयन नागरिकाचा रस्त्यात खून करण्यात आला. एका ब्रिटिश महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला, पण काही भारतीयांनी तिचे प्राण वाचविले. दिवसभर हे थैमान चालू होतेच. ब्रिटिश सैन्याने दिवसभरात केलेल्या गोळीबारात ८-२० स्वातंत्र्य सैनिक धारातीर्थी पडले. ह्या नंतररचे दोन दिवस अमृतसर शांत होते, पण पंजाबमधील इतर भागात मात्र हिंसा चालू होतीच. रेल्वेचे रूळ उखडण्यात आले, तारघर, डाकघर, सरकारी ईमारतींना आगी लावण्यात आल्या, ३ युरोपीयन नागरिक मारण्यात आले. ह्या प्रक्षोभक दंग्यांमुळे अखेर १३ एप्रिल रोजी पन्जाब मध्ये मार्शल लॉ जारी करण्यात आला.

योगायोग असा की १३ एप्रीला पंजाबी जनतेचा प्रिय सण ’बैसाखी’ पण होता. रिवाजानुसार हिंदू आणि शीख बान्धव सण साजरा करण्यास एकत्र जमले. प्रचंड जनसमुदाय जालीयानवाला बागेत जमला होता. पण मार्शल लॉ मुळे जमावबन्दी लागू होती. पाच किंवा जास्त जणांचा जमाव नियमबाह्य होता.

जालियनवाला बाग हत्याकांड महत्त्वाचे मुद्धे

  1. 20 जुलै 1905 रोजी सरकारने बंगालची फाळणी करण्याचा निर्णय जाहीर केला आणि ठिणगी पडली.
  2. सरकारचा दावा असा होता की प्रशासकीय विचारांतून हा निर्णय घेण्यात आला आहे. पण त्यामागे राष्ट्रवादी विचारांच्या बंग जनतेची फाळणी करण्याचा हेतू आहे हे जनतेने ओळखले होते.
  3. 16 ऑक्टोबर रोजी कलकत्यात सार्वत्रिक हरताळ पाळण्यात आला व लोकांनी एक दिवस उपोषण केले.
  4. कलकत्यांच्या अनेक रस्त्यांवरून मिरवणुका निघाल्या व संध्याकाळी प्रचंड सभा झाली. तिला 50,000 लोक हजर होते.
  5. बंगालच्या खेडयापाडयांतून न शहराशहरांतून सभा, मिरवणुका व निदर्शने यांचे पडसाद सतत उमटत होते.
  6. परकीय बनावटीच्या सर्व वस्तुवर बहिष्कार व त्याऐवजी स्वदेशी वस्तूंचा वापर हे या चळवळीचे सूत्र होते.
  7. अनेक ठिकाणी परदेशी कापडाच्या होळया पेटवण्यात आल्या आणि परदेशी कापड विकणाऱ्या दुकानांपुढे निदर्शने करण्यात आली.
  8. शाळा, कॉलेजांवर बहिष्कार, न्यायालये व सरकारी नोकऱ्यांचा त्याग असे या असहकार आंदोलनाचे स्वरूप होते, मात्र कार्यक्रमांतील हा भाग परिणामकारकरीत्या अमलात येऊ शकला नाही, परकीय जोखडातून स्वातंत्र्य, अशीही नव्या नेतृत्वाने हाक दिली.
  9. त्याचाच एक परिणाम म्हणजे डिसेंबर 1906 मधील काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून बोलतांना दादाभाई नौरोजींनी स्पष्ट केले की ‘स्वराज्य’ हेच काँग्रेसचे उद्दिष्ट आहेत.
  10. खेडयातील आणि शहरातील सर्वसामान्य जनतेला या चळवळीत सहभागी होण्याची प्रेरणा देण्यात नवे नेतृत्व विलक्षण यशस्वी झाले.
  11. विशेषतः विद्यार्थी, महिला आणि शहरी भागातील कार्यकर्ते, मोठया उत्साहाने या आंदोलनात सहभागी झाले, स्वदेशी आणि स्वराज्य या घोषणा लवकरच इतर प्रांतांतही प्रसृत झाल्या.
  12. परदेशी कापडावरील बहिष्काराचे आंदोलन तर अखिल भारतीय पातळीवर संघटित करण्यात आले.
  13. समान सहानुभूती व समान राजकारण या बंधनांनी सारा देश आता एक होऊ लागला.
  14. सरकारने दडपशाहीनेच या आंदोलनास उत्तर दिले. सभांवर बंदी घालण्यात आली.
  15. वृत्तपत्रांचा आवाज दडपून टाकण्यात आला. राजकीय कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. अनेक नेत्यांना परदेशी हद्दपार करण्यात आले आणि विद्यार्थ्यांना मारझोड करण्यात आली.
  16. सरकारने जहालांपासून मवाळांना व हिंदूपासून मुसलमानांना वेगळे काढण्याचे प्रयत्न केले.
  17. जनता आता जागृत झाली होती, पण तिला योग्य अशा संघटनेत बांधण्यात व लढयाला योग्य दिशा देण्यात नवे नेतृत्व अयशस्वी ठरले. उदाहरणार्थ निःशस्त्र प्रतिकाराची चळवळ प्रत्यक्षात आली नाही.
  18. अखेर लोकमान्य टिळकांना जेव्हा सहा वर्षे काळया पाण्याची शिक्षा झाली.
  19. बिपिनचंद्र पाल व अरविंद घोष यांनी राजकारण संन्यास घेतला व लाला लजपत राय परदेशी गेले तेव्हा सरकारला ही चळवळ दडपून टाकणे शक्य झाले.
  20. मोठया जन आंदोलनात परिणामकारक सहभागाची संधी न मिळाल्याने व सरकारी दडपशाहीचा प्रतिकार करण्यास कोणताच बाब न राहिल्याने युवा वर्ग दहशतवादी क्रांतिकारी मार्गाकडे वळला आणि तिरस्करणीय अधिकाऱ्यांची हत्या करणे हीच त्यांच्या राजकीय कार्याची पद्धत बनली. अनुशीलन व युगांतर हे त्या काळातील दोन प्रमुख दहशतवादी गट होते.
  21. या क्रांतिकारी दहशतवाद्यांना जनतेच्या पाठिंब्याचा आधार नव्हता व म्हणूनच ती चळवळ फार काळ टिकू शकली नाही. पण राष्ट्रीय चळवळीतील त्यांचेही योगदान मोलाचे आहे.
  22. इसवी सन 1909 पासून 1916 पर्यंत राष्ट्रवादी चळवळ सुप्त स्थितीत होती, पण पहिल्या महायुद्धाच्या काळात भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगणाऱ्या इंग्रज विदुषी अ‍ॅनी बेझंट यांनी आणि करावासातून मुक्त झालेल्या लोकमान्य टिळकांनी ‘इंडियन होमरुल लीग’च्या संरक्षणासाठी सनदशीर मार्गाने अखिल भारतीय आंदोलन पुन्हा सुरू केले.
  23. युद्धकाळात परदेशातील क्रांतिकारी कार्यकर्तेही क्रियाशील होते. त्यात अमेरिकेत व कॅनडात स्थापन झालेल्या व पूर्व आणि आग्नेय आशियात शाखा असलेल्या गदर पक्षाचा विशेष उलेख केला पाहिजे.
  24. त्यानेच भारतात सशस्त्र क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न केला.

हत्याकांड

हत्याकांडाच्या प्रतिक्रिया

भारतभर या हत्याकांडाच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. नोबेल पारितोषिक विजेते गुरू रविंद्रनाथ टागोर यांनी त्यांना इंग्रजांनी दिलेली 'सर' ही पदवी परत केली. या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी अनेक क्रांतीकारक जन्माला आले.

शहिद उधम सिंग (जे स्वतः या हत्याकांडामधे जखमी झाले होते) यांनी १३ मार्च १९४० या दिवशी या हत्याकांडाचे उत्तर म्हणून मिशाएल ओ'डायर (जो या हत्याकांडाचा सुत्रधार होता) यांवर बंदुकितून गोळ्या झाडुन वध केला.

जालियनवाला बाग हत्याकांड 
जालियनवाला बाग हुतात्मा स्मारक

बाह्य दुवे

Tags:

जालियनवाला बाग हत्याकांड जालियनवाला बाग सभाजालियनवाला बाग हत्याकांड महत्त्वाचे मुद्धेजालियनवाला बाग हत्याकांड हत्याकांडजालियनवाला बाग हत्याकांड हत्याकांडाच्या प्रतिक्रियाजालियनवाला बाग हत्याकांड बाह्य दुवेजालियनवाला बाग हत्याकांडअमृतसरइ.स. १९१९एप्रिल १३जालियनवाला बागरेजिनाल्ड डायर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कादंबरीहिंगोली लोकसभा मतदारसंघमहाविकास आघाडीकेंद्रशासित प्रदेशभारतभोपळाबीड विधानसभा मतदारसंघपुणे लोकसभा मतदारसंघअमर्त्य सेननाचणीकोकणनगदी पिकेप्राजक्ता माळीसंजय हरीभाऊ जाधवगौतम बुद्धभारतीय रिपब्लिकन पक्षघोरपडअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्राची हास्यजत्रालीळाचरित्रअरिजीत सिंगकामगार चळवळदिल्ली कॅपिटल्सवि.वा. शिरवाडकरआदिवासीजागतिक व्यापार संघटनाबैलगाडा शर्यतसमासकलावंजारीकॅमेरॉन ग्रीनक्षय रोगरत्‍नागिरीसंयुक्त महाराष्ट्र चळवळतमाशामराठी भाषा गौरव दिनसंदीप खरेफकिरायवतमाळ विधानसभा मतदारसंघविले पार्ले विधानसभा मतदारसंघनालंदा विद्यापीठपंकजा मुंडेसंत तुकारामघनकचराकोल्हापूर जिल्हामुखपृष्ठधर्मनिरपेक्षताप्रकल्प अहवालजेजुरीलोकगीतसम्राट हर्षवर्धनमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळनियतकालिकभारताची अर्थव्यवस्थाअमरावतीवस्तू व सेवा कर (भारत)देवनागरीअंकिती बोसराज्यपालभारताचा स्वातंत्र्यलढानोटा (मतदान)मानवी शरीरभीमाशंकरज्ञानेश्वरनिलेश लंकेमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)जाहिरातसंदिपान भुमरेमहाराष्ट्र पोलीसजागतिक लोकसंख्यारोहित शर्मागुढीपाडवावाशिम जिल्हाशिवाजी महाराजांची राजमुद्रामहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीसेवालाल महाराज🡆 More