मांडुक्योपनिषद हे अथर्ववेद शाखेतील एक उपनिषद आहे .
हे उपनिषद संस्कृत भाषेत लिहिलेले आहे. त्याचे निर्माते वैदिक काळातील ऋषी मानले जातात. उपनिषदांमध्ये सांगितलेले जग आणि भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमानकाळ आणि त्यांच्या पलीकडे जे काही नित्य घटक सर्वत्र पसरलेले आहेत. हे सर्व ब्रह्म आहे आणि हा आत्मा देखील ब्रह्म आहे. आत्मा चतुष्पाद आहे, म्हणजेच जागरण, स्वप्न, निद्रा आणि तुरिया या त्याच्या प्रकट होण्याच्या चार अवस्था आहेत. या उपनिषद मध्ये, या प्रमाणात एक अद्वितीय स्पष्टीकरण देऊन ओम , मूळ आणि ताल या जिवंत अस्तित्व आणि विश्व पासून ब्राह्मण आणि ओळख किंवा तीन न साजरा सुधारण्यावर जोर दिला करण्यात आले आहे. याशिवाय वैश्वानर या शब्दाचे वर्णन इतर ग्रंथांमध्येही आढळते. मांडूक्य उपनिषद हे छोट्या उपनिषदांपैकी एक असून त्याचे वर्गीकरण अथर्ववेदासोबत केले जाते. मुक्तिकोपनिषदात दिलेल्या १०८ उपनिषदांच्या यादीमध्ये या उपनिषदाचा क्रमांक सहावा आहे. हे गद्यात्मक असून यात एकूण १२ मंत्र आहेत. यापैकी काही मंत्रांचा संबंध ऋग्वेदाशीही जोडला जातो. हे उपनिषद् ओम् (ॐ) या अक्षराची चर्चा करते, चेतनेच्या चार अवस्थांचा सिद्धांत मांडते आणि आत्म्याच्या अस्तित्वाचे आणि स्वरूपाचे प्रतिपादन करते. मांडूक्य उपनिषदाचे खास वैशिष्ट्य असे की मुक्तिकोपनिषदातील श्रीराम आणि हनुमान यांच्यामधील संवादानुसार मोक्षप्राप्तीसाठी हे एकच उपनिषद् पुरेसे आहे असे प्रभू श्रीरामांनी म्हटलेले आहे. मुक्तिकोपनिषदातील ११ मुख्य उपनिषदांमध्ये मांडूक्य उपनिषदाचा पहिला क्रमांक आहे. या उपनिषदावर गौडपादाचार्य यांच्या कारिका आहेत. हिंदू तत्त्वज्ञान आणि बौद्ध तत्त्वज्ञान यांच्यामधील परस्परसंबंध दाखवण्यासाठी ज्या संहितांचा वारंवार उल्लेख केला जातो त्यांपैकी मांडूक्योपनिषद एक आहे.
मांडूक्य या या शब्दाची उत्पत्ती ‘मंडूक’ या शब्दापासून झाली असावी असे मानले जाते. या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. बेडूक, घोड्याची एक विशिष्ट प्रजाती, घोड्याच्या खुरांचे तळ किंवा आध्यात्मिक तणाव असे याचे काही अर्थ होतात. काही लेखकांनी मांडूक्य उपनिषदाच्या नामाभिधानामागे बेडूक हा अर्थ असल्याचे सुचविलेले आहे. ‘मन’ याचा अर्थ हृदय किंवा मन आणि ‘डूक’ याचा दुःख याचा अर्थ तणाव किंवा दुःख निर्माण करणाऱ्या अडचणी. परमेश्वराबाबतचे आकलन चुकीचे असल्यास किंवा असे आकलनच नसल्यास दुःख किंवा तणाव निर्माण होऊ शकतो, अशीही व्युत्पत्ती मांडली जाते.
उपनिषदांच्या रचनेच्या काळाबाबत विद्वानांचे एकमत नाही. काही उपनिषदे वेदांच्या मूळ संहितांचा भाग मानली जातात. वेद हे सर्वात जुने आहेत. काही उपनिषदे ब्राह्मण्य आणि आरण्यक ग्रंथांचा भाग मानली जातात. त्यांची रचना संहितांनंतरची आहे. हिंदू धर्मातील श्रुती धर्मग्रंथांमध्ये उपनिषदे महत्त्वाची आहेत. ते वैदिक साहित्याचा अविभाज्य भाग आहेत. उपनिषदांमध्ये, कर्मकांडांना 'कनिष्ठ' संबोधून ज्ञानाला महत्त्व दिले गेले कारण ज्ञान स्थूल (जग आणि पदार्थ) पासून सूक्ष्म (मन आणि आत्मा) कडे घेऊन जाते. ब्रह्म , जीव आणि जगाचे ज्ञान प्राप्त करणे ही उपनिषदांची मूलभूत शिकवण आहे. उपनिषदे हा भारतीय आध्यात्मिक विचारांचा मूळ पाया आहे, भारतीय आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचा स्रोत आहे.
This article uses material from the Wikipedia मराठी article मांडूक्योपनिषद, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.