प्रल्हाद केशव अत्रे

प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे (ऑगस्ट १३, इ.स.

१८९८">इ.स. १८९८ - जून १३, इ.स. १९६९) हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते होते. ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते.

प्रल्हाद केशव अत्रे
प्रल्हाद केशव अत्रे
प्रल्हाद केशव अत्रे
जन्म नाव प्रल्हाद केशव अत्रे
टोपणनाव केशवकुमार
जन्म १३ ऑगस्ट १८९८
कोडीत खुर्द, महाराष्ट्र, भारत
मृत्यू १३ जून १९६९
वरळी ,(मुंबई),महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, पत्रकारिता, राजकारण, चित्रपट, शिक्षण
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा, कादंबरी, नाटक, कविता, चरित्र लेखन,वृत्तपत्र
प्रसिद्ध साहित्यकृती डॉ. लागू, झेंडूची फुले, कऱ्हेचे पाणी (आत्मचरित्र)
वडील केशव विनायक अत्रे
आई अन्नपूर्णाबाई केशव अत्रे
अपत्ये शिरीष पै, मीना देशपांडे

आचार्य अत्र्यांच्या घणाघाती भाषणांमुळेच संयुक्त महाराष्ट्र मिळाला असे मानले जाते. अत्रे यांचे बाळासाहेब ठाकरे यांच्याशी जाहीर वाद होते.

जन्म व बालपण

आचार्य अत्रे यांचा जन्म १३ ऑगस्ट, १८९८ रोजी पुणे जिल्ह्यातील सासवड जवळील कोडित खुर्द या गावी देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील लिपिक होते आणि काही काळासाठी सासवड नगरपालिकेचे सचिव होते आणि त्यांचे काका एमईएस वाघिरे हायस्कूल सासवड येथे शिक्षक होते. सासवडच्या एमईएस वाघिरे हायस्कूलमधून त्यांनी प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. १९१९ मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी मॅट्रिक पूर्ण केले. पुणे विद्यापीठातून त्यांनी कला शाखेची पदवी पूर्ण केली. पदवीनंतर अत्रे यांनी शाळेत शिक्षक म्हणून काम केले. अत्रे यांनी १९२८ मध्ये लंडन विद्यापीठातून टी.डी. (शिक्षक पदविका) केले. भारतात परत येण्यापूर्वी त्यांनी सिरिल बर्ट यांच्या हाताखाली प्रायोगिक मानसशास्त्राचा अभ्यास केला आणि हॅरो येथे अध्यापन केले.

कारकीर्द

पत्रकारिता

इ.स. १९२३ साली अत्र्यांनी 'अध्यापन' मासिक सुरू केले. इ.स. १९२६ मध्ये 'रत्‍नाकर' व इ.स. १९२९ साली 'मनोरमा', आणि पुढे इ.स. १९३५ साली 'नवे अध्यापन' व इ.स. १९३९ साली 'इलाखा शिक्षक' ही मासिके काढली. जानेवारी १९, इ.स. १९४० साली त्यांनी नवयुग साप्ताहिक सुरू केले. जुलै ८, इ.स. १९६२ पर्यंत ते चालू होते. जून २, इ.स. १९४७ रोजी अत्र्यांनी जयहिंद हे सांजदैनिक सुरू केले; परंतु ते वर्षभरच चालले. नोव्हेंबर १५, इ.स. १९५६ रोजी त्यांनी मराठा हे दैनिक सुरू केले. ते त्यांच्या हयातीनंतरही काही काळ प्रकाशित होत होते. २१ जानेवारी १९४०ला अत्रे यांनी नवयुग हे वृत्तपत्र सुरू केले. त्यावेळी अत्रे काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे काँग्रेसची विचारसरणी या वृत्तपत्रातून स्वातंत्र्य मिळेपर्यंत मांडली जात होती.

संस्था

आचार्य अत्रे यांच्या स्मरणार्थ त्यांचे नाव असलेल्या अनेक संस्था स्थापन झाल्या. त्यांतली काही या :-

  • आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली(पश्चिम), मुंबई
  • आचार्य अत्रे कट्टा सांस्कृतिक मंडळ, ठाणे
  • आचार्य अत्रे कन्या कॉलेज, पुरंदर (पुणे जिल्हा)
  • आचार्य अत्रे नाट्यगृह, पिंपरी (पुणे)
  • आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, सासवड (पुरंदर तालुका-पुणे जिल्हा)
  • आचार्य अत्रे (यांचा भव्य) पुतळा, वरळी (मुंबई) (पुतळ्याची उंची ३४ फूट)
  • आचार्य अत्रे यांचा पुतळा, आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन, सासवड (पुणे जिल्हा). हाच चार फूट उंचीचा पुतळा पूर्वी मुंबईत वरळी येथे होता.
  • आचार्य अत्रे प्रतिष्ठान, पुणे
  • आचार्य अत्रे प्रतिष्ठान, पुरंदर (पुणे जिल्हा)
  • आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी (पुणे)
  • आचार्य अत्रे सभागृह, पुणे (उद्‌घाटन २९ मार्च १९८१)
  • आचार्य अत्रे (वार्षिक) साहित्य संमेलन, सासवड
  • सासवड नगरपालिकेने बांधलेले आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन, सासवड (पुणे जिल्हा)
  • आचार्य अत्रे स्मारक समिती, मुंबई. (स्मारकाची सर्व नियोजित कामे पूर्ण झाल्याने फेब्रुवारी २०१२ मध्ये ही समिती बरखास्त करण्यात आली.)
  • आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान, पुणे ४११०१६

पहा : प्रतिष्ठाने

चित्रपट

इ.स. १९३४ साली सरस्वती सिनेटोनच्या दादा तोरण्यांच्या आग्रहाखातर नारद-नारदी चित्रपटाची कथा व संवाद अत्र्यांनी लिहून दिले. 'हंस पिक्स्चर्स'साठी इ.स. १९३७ साली त्यांनी इब्सेनच्या 'पिलर ऑफ द सोसायटी' या कथेवरून धर्मवीर, स्वतःच्याच कथांवरून प्रेमवीर ह्या मराठी व 'बेगुनाह' ह्या हिंदी चित्रपटांच्या पटकथा लिहून दिल्या. इ.स. १९३८ साली 'हंस' साठीच 'ब्रह्मचारी' चित्रपटाची कथा त्यांनी लिहून दिली. त्यांनी लिहिलेला 'ब्रॅंडीची बाटली' हा चित्रपटही लोकप्रिय ठरला.
अत्र्यांनी राजगुरू व अभ्यंकर या इतर दोन भागीदारांसोबत एआरए या नावाने 'नवयुग चित्रपट कंपनी' काढली. पुढे 'हंस पिक्चर्स' मधले मास्टर विनायक, पांडुरंग नाईक, बाबूराव पेंढारकर हेदेखील भागीदार झाल्यावर या कंपनीने ’नवयुग पिक्चर्स’ असे नाव बदलून घेतले. इ.स. १९४० साली नवयुग पिक्चर्सतर्फे 'लपंडाव' चित्रपटाची कथा अत्र्यांनी लिहिली. 'लपंडाव' चित्रपटानंतर त्यांनी 'संत सखू' या चित्रपटाचे संवाद लिहिले. परंतु 'प्रभात'ने ही हाच विषय घेतला आहे या कारणाने मास्टर विनायकांनी त्याला विरोध केला. नवयुग पिक्चर्सने मग वि.स. खांडेकरांची 'अमृत' ही कथा घेऊन चित्रपट काढावयाचे ठरवले. या वादामुळे अत्र्यांनी नवयुग पिक्चर्स सोडले.
१९४२ साली अत्रे पिक्चर्स ची निर्मिती असलेला वसंतसेना हा चित्रपट मराठी व हिंदी भाषेतील आवृत्त्यांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाची निर्मिती, कथा, पटकथा, संवाद व गीते अत्र्यांची होती. या चित्रपटाचे गजानन जहागीरदार हे दिग्दर्शक होते, तर संगीतकार होते मास्टर कृष्णराव.
अत्र्यांनी दिग्दर्शित केलेल्या "श्यामची आई" चित्रपटाला १९५४ साली सुरू झालेल्या "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार" सोहोळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले "सुवर्ण कमळ" मिळाले होते.

अध्यापन

मुंबईत पहिले सहा महिने सॅंढर्स्ट हायस्कूलमध्ये इंग्रजी व गणित शिकवले, व नंतर रॉबर्ट मनी स्कूलमध्ये एक महिना वर्गशिक्षक व त्यानंतर फोर्टमधल्या न्यू स्कूल (भरडा न्यू हायस्कूल) मध्ये संस्कृत शिक्षक म्हणून नोकरी. पुण्याला कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत १८ वर्षे मुख्याध्यापक म्हणून लौकिक मिळवला व शाळेचा मोठा विस्तार केला. त्यावेळी त्यांना फक्त ३५ रुपये पगार होता. ही शाळा अत्र्यांच्या नाट्यलेखनाची, समाजसेवेची प्रयोगशाळाच होती. जातिभेदाच्या भिंती फोडण्याचा मंत्र अत्र्यांना या शाळेतच मिळाला.

जून १९२४ साली मुंबईच्या सरकारी ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिक्षणशास्त्राचे प्रशिक्षण घेऊन बी. टी. परीक्षेत वर्गात प्रथम आले व त्यानंतर १९२७ ते १९२८ सालच्या दरम्यान इंग्लंडला टीचर्स डिप्लोमा मिळवला. पुण्यात राजा धनराज गिरजी व मुलींची आगरकर हायस्कूल यांची स्थापना केली. प्राथमिक शाळेसाठी "नवयुग वाचनमाला" व दुय्यम शाळेसाठी "अरुण वाचनमाला" ह्या दोन क्रमिक पुस्तकांच्या माला लिहिल्या. १९३७ साली पुणे नगरपालिकेत निवडून आल्यानंतर शिक्षकांसाठी गांधी ट्रेनिंग कॉलेज काढले.

उणिवा आणि निष्ठा

आदर्शांची पायमल्ली, मनाविरुद्ध मते मांडली की तुटून पडणे, चारित्र्यहनन, माहितीची शहानिशा करून न घेता प्रहार करणे, अशा अत्र्यांच्या काही उणिवांवर बोट ठेवले जाते. असे असले तरी त्यांच्या काही निष्ठा पक्क्या होत्या. त्यापैकी एक म्हणजे सामाजिक बांधिलकी. समाजातील दुर्बल घटक, गोरगरीब, तळागाळातील माणसे, अज्ञजन, उपेक्षित, दलित यांचा आपल्या सामर्थ्यानिशी अत्र्यांनी सतत कैवार घेतला.

पुस्तके

शाळांसाठी क्रमिक पुस्तके

आचार्य अत्र्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले असून त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. त्यांनी आणि शंकर केशव कानेटकर (कवी गिरीश) यांनी संपादित केलेली अरुण वाचनमाला नावाची मराठीची क्रमिक पुस्तके शाळेच्या इंग्रजी पहिली ते इंग्रजी पाचवी (हल्लीची पाचवी ते नववी)च्या अभ्यासक्रमांत होती, सन १९३४ साली निघालेल्या या क्रमिक पुस्तकांसारखी सुरेख पुस्तके त्यापूर्वी आणि त्यानंतर कधीही निघाली नाहीत, असे शिक्षकांचे आणि पालकांचे मत आहे. ही पुस्तके पहायला मिळणेही अशक्यप्राय झाल्याने, डिंपल प्रकाशनाने या पुस्तकांची नवीन पुनर्मुद्रित आवृत्ती आचार्य अत्रे यांच्या ११९ व्या जयंतीनिमित्त १३ ऑगस्ट २०१७ रोजी बाजारात आणली आहे. आचार्य अत्रे यांचे नवयुग मराठा साप्ताहिकाचा पहिला अंक १९४० २१ जानेवारी रोजी प्रकाशित झाला.

आचार्य अत्रे आणि गिरीश दोघेही हाडाचे द्रष्टे शिक्षक होते. त्यावेळी ते अनुक्रमे कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल आणि न्यू इंग्लिश स्कूल, पुणे येथे मराठीचे अध्यापक होते. अत्रे तर लंडनहून शिक्षणशास्त्रातील उच्च पदविका घेऊन परतले होते; आणि शाळेचे मुख्याध्यापक होते. तेव्हा अशा जाणकारांच्या अनुभवातून ही पुस्तके तयार झाली आणि एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे अवघ्या शिक्षणक्षेत्राला दिशादर्शकाचे काम करू लागली. २०१७ सालीही या पुस्तकांतील कल्पना कालसुसंगत असल्याचे जाणवते. पुस्तकांच्या प्रस्तावनेत उल्लेख केल्याप्रमाणे ही पुस्तके आधुनिक भाषा-शिक्षणाची व अध्यापनशास्त्राची तत्त्वे लक्षात घेऊन तयार केली आहेत. पुस्तकांची रचना (Design) करताना कला आणि वाङ्मय हा मुख्य दृष्टिकोन ठेवला आहे. पुस्तके मनोरंजक करण्याच्या प्रयत्नात फार सोपी होतात आणि शैक्षणिकदृष्ट्या निरुपयोगी ठरतात. ‘मनोरंजकत्व म्हणजे सुलभत्व नव्हे!’ गद्य-पद्य लेखनातील विविध फुलोरे, छटा आणि तऱ्हा यांचा मनोज्ञ संगम या पुस्तकांत अनुभवायला मिळेल. सारांश, राष्ट्रीय, महाराष्ट्रीय आणि मानवी अशा तिहेरी दृष्टीने या पुस्तकांची केलेली रचना जाणकारांना प्रतीत होईल.’

नाटके

काव्य

कथासंग्रह

आत्मचरित्र

कादंबऱ्या

  • चांगुणा
  • मोहित्यांचा शाप

इतर

  • अत्रेटोला
  • अत्रेप्रहार
  • अत्रेवेद
  • अध्यापक अत्रे
  • अप्रकाशित आचार्य अत्रे (संपादक : डॉ. नागेश कांबळे)
  • आमदार आचार्य अत्रे
  • आषाढस्य प्रथम दिवसे
  • इतका लहान एवढा महान
  • केल्याने देशाटन
  • क्रांतिकारकांचे कुलपुरुष
  • चित्रकथा भाग-१
  • चित्रकथा भाग-२
  • जय हिंद जय महाराष्ट्र
  • झालाच पाहिजे
  • दलितांचे बाबा
  • दूर्वा आणि फुले
  • मराठी माणसे, मराठी मने
  • महापूर
  • महाराष्ट्र कालचा आणि आजचा
  • मी अत्रे बोलतोय
  • मी कसा झालो?
  • मुद्दे आणि गुद्दे
  • वस्त्रहरण
  • विनोद गाथा
  • विनोबा
  • संत आणि साहित्य
  • समाधीवरील अश्रू
  • सिंहगर्जना
  • सुभाष कथा
  • सूर्यास्त
  • हंशा आणि टाळ्या
  • हार आणि प्रहार
  • हास्यकट्टा
  • हुंदके
  • शापित यक्ष.(ऑस्कर वाईल्ड बद्दल)
  • गुरूचरणी (रा.ग.गडकरींसंबंधी)
  • अत्रेयवाणी
  • अत्रे विचार
  • वाघनखं

न लिहिलेली पुस्तके

आचार्य अत्रे हे महाकवी कालिदास आणि गानअवलिया तानसेन अशी दोन नाटके बालगंधर्वांसाठी लिहिणार होते. ते संत नामदेव, संत जनाबाई ही नाटके छोटा गंधर्व आणि जयमाला शिलेदार यांच्यासाठी आणि शाहीर सगनभाऊ तुकाराम शिदे व 'मेघमाला' संजीवनी बीडकरसाठी लिहिणार होते. दत्ता भट यांच्यासाठी ते ‘महात्मा फुले’ हे नाटक लिहिणार होते. चार्वाक या प्राचीन काळातल्या प्रचलित समाजव्यवस्थेविरुद्ध बंड करून उठलेल्या एका तत्त्ववेत्त्यावरही त्यांना नाटक लिहायचे होतं. त्यासाठी त्यांनी माहिती गोळा करायलाही सुरुवात केली होती. अत्र्यांनी ‘तुकाराम’ नाटकही लिहायचे ठरवले होते. आचार्य अत्र्यांनी वासुदेव चंद्रचूड यांच्यासाठी ‘पुंडलिक’ ठरवला होता;. ‘शिवसमर्थ’ नाटकाचा तर एकदीड अंकही त्यांनी लिहिला होता.

पुरस्कार आणि सन्मान

  • विष्णूदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती ही इसवी सनाच्या १९६० सालापासून विष्णूदास भावे पुरस्कार देत आली आहे. आचार्य अत्रे यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
  • आचार्य अत्रे यांना स्वतःला फारसे पुरस्कार मिळाले नसले तरी त्यांच्या नावाने आचार्य अत्रे प्रतिष्ठान (पुणे) यासारख्या अनेक संस्था आचार्य अत्रे पुरस्कार देतात.
  • अशोक हांडे यांची संकल्पना, लेखन व दिग्दर्शन असलेला ‘अत्रे-अत्रे-सर्वत्रे’ हा अत्रे यांची संगीतमय जीवनकथा सांगणारा कार्यक्रम आहे.
  • ’मी अत्रे बोलतोय’ हा एकपात्री कार्यक्रम करणारे अनेकजण आहेत. सदानंद जोशी हे त्यांपैकी एक प्रमुख. डॉ.अनंत एस. परांजपे हेदेखील ’मी अत्रे बोलतोय’ करतात.
  • दरवर्षी आचार्य अत्र्यांच्या जन्मदिनी म्हणजे १३ ऑगस्ट रोजी सासवड येथे आचार्य अत्रे साहित्य संमेलन भरते. अनेक कार्यक्रमांसोबत त्या संमेलनात अत्र्यांच्या नावाचे काही पुरस्कार दिले जातात.
  • आचार्य अत्रे यांच्या संपूर्ण पुस्तकांचा दांडगा अभ्यास असलेले दिलीप देशपांडे हे आचार्य अत्रे यांच्यावर बेतलेला ‘अष्टपैलू अत्रे’ हा एकपात्री नाट्यप्रयोग सादर करतात.

आचार्य अत्र्यांसंबंधी लिहिली गेलेली पुस्तके

  • अत्र्यांचं अंतरंग (सुधाकर वढावकर)
  • अध्यापक अत्रे (प्र. के. अत्रे)
  • आचार्य अत्रे जेव्हा विद्यार्थी होते - शिरीष पै
  • आचार्य अत्र्यांचे महान समकालीन (डॉ. सुधीर मोंडकर)
  • आठवणीतले अत्रे - अप्पा परचुरे
  • खुमासदार अत्रे (प्रा. श्याम भुर्के)
  • थोर नाटककार आचार्य अत्रे (आनंद जयराम बोडस)
  • युगप्रवर्तक चित्रपट कथाकार आचार्य अत्रे (शशिकांत॰ श्रीखंडे)
  • वडिलांचे सेवेसी (शिरीष पै)

अत्रे वाङ्‌मय प्रदर्शन

पुण्यातील सुहास बोकील हे आचार्य अत्रे यांच्या वाङ्‌मयाचे संग्राहक आहेत. ते अत्रे वाङ्‌मयाचे प्रदर्शन भरवीत असतात. फेब्रुवारी २०१६ पर्यंत बोकील यांनी अशी ४२ प्रदर्शने भरवली आहेत. प्रदर्शनात अत्र्यांची पुस्तके, वर्तमानपत्रांत आलेल्या बातम्यांची कात्रणे, कागदपत्रे, अत्र्यांच्या हस्ताक्षरातील पत्रे, ऑडिओ-व्हीडिओ आदींचा समावेश असतो.

हे सुद्धा पहा

संदर्भ

Tags:

प्रल्हाद केशव अत्रे जन्म व बालपणप्रल्हाद केशव अत्रे कारकीर्दप्रल्हाद केशव अत्रे संस्थाप्रल्हाद केशव अत्रे अध्यापनप्रल्हाद केशव अत्रे उणिवा आणि निष्ठाप्रल्हाद केशव अत्रे पुस्तकेप्रल्हाद केशव अत्रे न लिहिलेली पुस्तकेप्रल्हाद केशव अत्रे पुरस्कार आणि सन्मानप्रल्हाद केशव अत्रे आचार्य अत्र्यांसंबंधी लिहिली गेलेली पुस्तकेप्रल्हाद केशव अत्रे अत्रे वाङ्‌मय प्रदर्शनप्रल्हाद केशव अत्रे हे सुद्धा पहाप्रल्हाद केशव अत्रे संदर्भप्रल्हाद केशव अत्रेइ.स. १८९८इ.स. १९६९ऑगस्ट १३कवीचित्रपटजून १३नाटककारमराठी भाषालेखकसंपादकसंयुक्त महाराष्ट्र चळवळ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

हिंगोली विधानसभा मतदारसंघकॅमेरॉन ग्रीनदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारशनि (ज्योतिष)अकोला लोकसभा मतदारसंघस्त्री नसबंदी शस्त्रक्रियाऔरंगजेबविले पार्ले विधानसभा मतदारसंघशिवाजी महाराजउचकीमहाराष्ट्रातील आरक्षणसांगली लोकसभा मतदारसंघअकोला जिल्हाउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्राचा इतिहासरामदास आठवलेहिंदू धर्मकांजिण्यागांडूळ खतसंयुक्त महाराष्ट्र समितीअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९स्वामी समर्थदुष्काळलोकसंख्याशाश्वत विकासमहिलांसाठीचे कायदेज्ञानेश्वरयोनीहनुमान जयंतीवृषभ रासवर्धा लोकसभा मतदारसंघविजयसिंह मोहिते-पाटीलछत्रपती संभाजीनगर जिल्हाभारतीय प्रजासत्ताक दिनदिल्ली कॅपिटल्ससमासछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसशिक्षणगणितअमित शाहजिजाबाई शहाजी भोसलेनगदी पिकेप्राथमिक आरोग्य केंद्रकोकणशुभेच्छामहाराष्ट्रातील स्थानिक शासनभारतीय राष्ट्रीय काँग्रेसओमराजे निंबाळकरमधुमेहनागपूरजालना विधानसभा मतदारसंघतेजस ठाकरेरायगड (किल्ला)गुरू ग्रहश्रीधर स्वामीमाढा लोकसभा मतदारसंघशिल्पकलाउत्तर दिशाशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकसाम्यवाददशावतारसंवादरेणुकाकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघकामगार चळवळभारताचा इतिहासमहालक्ष्मीभारतीय संसदविनयभंगप्रदूषणप्रणिती शिंदेनालंदा विद्यापीठयोगमहाराष्ट्र दिनहिरडा🡆 More