वाचताना थांबायचे कुठे आणि कोणत्या शब्दावर जोर द्यायचा यासाठी विरामचिन्हांचा वापर होतो.
मराठी ही मोडी लिपीत लिहिली जाई. त्या लिपीत विरामचिन्हे नव्हती, संस्कृतमध्येही 'दंड' सोडल्यास अन्य विरामचिन्हे नव्हती. मराठी-इंग्रजी शब्दकोशकार मेजर थॉमस कँडी याने मराठी देवनागरीत लिहायला सुरुवात केली आणि विरामचिन्हे पहिल्यांदा वापरली. पुढे हे सर्व लोकमान्य आणि रूढ झाले. अपूर्णविरामासारखा एखाद-दुसरा अपवाद वगळता, विराम चिन्ह हे अक्षराला चिकटून येते; अक्षर आणि विरामचिन्ह यांच्या दरम्यान जागा सोडायला परवानगी नाही. मात्र विरामचिन्हानंतर एक जागा सोडूनच पुढचा शब्द (असल्यास) लिहितात.
बोलली जाणारी कोणतीच भाषा अशुद्ध नसते. भाषा लेखनाला मात्र काही वैश्विक परिमाणे असतात. थोड्याशा सजगतेने वाचन केले तर ती लक्षात येतात. नियम पाठच करायला हवेत असे नाही.
आपण जेव्हा बोलतो त्यावेळी आपले बोलणे ऐकणाऱ्याला अचूकपणे कळते. ते लिहिताना मात्र प्रमाणलेखनात असावे. कारण वाचणारा दुनियेच्या कुठल्याशा कोपऱ्यात असतो हे आपल्याला माहीत असतेच असे नाही. शिवाय प्रमाणलेखन भाषेचे/लिपीचे सौंदर्य वाढवत असते. वाचताना थांबायचे कुठे, किती वेळ आणि कोणत्या शब्दावर जोर द्यायचा यासाठी विरामचिन्हांचा उपयोग होतो. वाचणाऱ्याला आपल्या मनातील भावना नेमकेपणाने कळवाव्यात यासाठीही ते आवश्यक वाटते.
भाषाभाषांत थोड्याफार फरकाने नियम सारखेच असतात. संस्कृत भाषा देवनागरी लिपीत लिहिताना केवळ दंड (।) या व्याकरण चिन्हाचा वापर केला जाई. मोडी लिपीत ऱ्हस्व-दीर्घ नसायचे तशी व्याकरण चिन्हेही नसायची. आज आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून आपण आग्रह करत आहोत. तो रास्त आहे. तसा दर्जा मराठीला मिळायलाच हवा.
दोन शब्दांमध्ये व वाक्यांमध्ये योग्य अंतर असलं पाहिजे. मात्र मराठीसाठी आंग्लभाषेतून स्वीकारलेली व्याकरण चिन्हे लिहिताना ती शब्दास जोडून लिहिली जावीत.
वृत्त आणि छंदातील काव्य लिहिताना कवीला ऱ्हस्व-दीर्घाचे स्वातंत्र्य असते. मात्र काही महाकवी मुक्तछंदातही नको तिथे जोड-तोड करतात.
एखाद्याचे उद्गार लिहिताना मात्र ते दुहेरी अवतरण चिन्हात जसेच्या तसे लिहिले जातात.
अ) मी मराठी बोलतो.
ब) हे चिन्ह संक्षिप्त रूपात शेवटीही वापरतात.
उदा० वि.स. खांडेकर यात विष्णूऐवजी वि.आणि सखारामऐवजी स. ही संक्षिप्त रूपे वापरून त्यांसमोर पूर्णविरामासारखे चिन्ह काढले आहे.
अ) शीतकपाटात भाजी, गाजरे, पालक, बीट व काकडी आहे.
ब) श्रोतेहो, आज आपण या विषयावर बोलू.
स्वल्पविराम चिन्हाला हिंदीत 'अल्पविराम चिन्ह' व इंग्रजीत 'काॅमा' म्हणतात.
मुख्य ऋतू तीन आहेत : उन्हाळा, पावसाळा व हिवाळा.
हे चिन्ह अक्षराला जोडून येत नाही.
१. त्याने खूप मेहनत केली; पण त्याला योग्य ते फळ मिळाले नाही.
२. इतक्यात, आकाशात जिकडे तिकडे ढग दिसू लागले; थोड्याच वेळाने गारांचा वर्षाव होऊ लागला; त्या गारांच्या माऱ्याने डोक्यास टेंगळे आली; अशा कचाट्यात आमची मैना सापडली.
अनेकदा एकापाठोपाठ तीन उद्गारचिन्हे (!!!) वापरून उद्गारांची तीव्रता दाखवतात.
उदा. भारताचे प्रवेशद्वार कोठे आहे? सध्याचे राज्यपाल कोण आहेत?
उदा०"तो माणूस माझा मोठा भाऊ आहे."असे शिरीष म्हणाला. जर अशी वाक्ये एकापाठोपाठ अनेक परिच्छेदांमध्ये विस्तारली असतील तर प्रत्येक परिच्छेदारंभी पहिले दुहेरी अवतरणचिन्ह येते. दुसरे अवतरण चिन्ह शेवटचा परिच्छेद जेथे संपतो तेथे येते.
१). ४-५ (चार ते सहा/चार किंवा पाच).
२). कालावधी दाखविण्यासाठी. उदा० १९४७-१९५२ (४७ ते ५२) या काळात.
विराम चिन्हांखेरीज छापलेल्या मजकुरात काही 'छपाई' चिन्हे आढळतात; त्यांपैकी काही चिन्हे सुद्धा :
उदा.नचिकेत² वज्रबाहू³
उदा.
तुम्ही एक ^माणूस आहांत. वगैरे, वगैरे.
खालील गोष्ट प्र.के. अत्र्यांविषयी प्रसिद्ध असलेल्या अनेक आख्यायिकांपैकी एक आहे.[ संदर्भ हवा ] स्वल्पविरामाचे महत्त्व दर्शविणारे एक विनोदी उदाहरण म्हणूनच केवळ त्याचा येथे उल्लेख केला आहे.
एकदा ना.सी. फडके अत्र्यांना म्हणाले, "वाक्यात स्वल्पविरामाचा नक्की उपयोग काय?" अत्रे म्हणाले, " योग्य वेळ आली की मी ते तुम्हाला सांगीन."
त्यानंतर लवकरच फडक्यांच्या पत्नीला अत्रे भेटले असताना अत्रे म्हणाले,
"मी तुझा नवरा तू माझी बायको आपण सिनेमाला जाऊ या."
ही गोष्ट फडक्यांच्या कानावर आली, आणि त्यांनी अत्र्यांकडे त्याबाबत खुलासा मागितला. अत्र्यांनी स्पष्टीकरण दिले ते असे :
"अहो, मी म्हटले होते 'मी, तुझा नवरा, तू, माझी बायको, आपण सिनेमाला जाऊ या.'
या विषयी एक गंमतीदार कविता आहे, ती अशी :
'अनुस्वारी' शुभकुंकुम ते
भाळी सौदामिनी ।
'प्रश्नचिन्ही'डुलती झुमके
सुंदर तव कानी ।
नाकावरती 'स्वल्पविरामी'
शोभे तव नथनी ।
'काना' काना गुंफुनी माला
खुलवी तुज कामिनी ।
'वेलांटी'चा पदर शोभे
तुझिया माथ्याला ।
'मात्रां'चा मग सुवर्णचाफा
वेणीवर माळिला ।
'उद्गारांचा' तो गे छल्ला
लटके कमरेला ।
'अवतरणां'च्या बटा
मनोहर भावती चेहऱ्याला ।
'उ'काराचे पैंजण झुमझुम
पदकमलांच्यावरती ।
'पूर्णविरामी'
तिलोत्तम तो
शोभे गालावरती ।।
रोको, मत जाने दो!
रोको मत, जाने दो!
This article uses material from the Wikipedia मराठी article विरामचिन्हे, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.