आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
नथुराम विनायक गोडसे (मे १९, इ.स. १९१०; बारामती, पुणे जिल्हा, महाराष्ट्र - नोव्हेंबर १५, इ.स. १९४९) हा महात्मा गांधी चा मारेकरी होता. त्याने ३० जानेवारी १९४८ रोजी नवी दिल्ली येथे गांधीच्या छातीवर तीन गोळ्या झाडल्या. गोडसे हा पुण्यातील हिंदुत्ववादी होता. तसेच तो हिंदू महासभेचा सदस्य होता आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) माजी सदस्य होता. १९४७ च्या भारताच्या फाळणीच्या वेळी गांधींनी ब्रिटिश भारतातील मुस्लिमांच्या राजकीय मागण्यांना अनुकूलता दर्शवली असे त्याचे मत होते. त्याने नारायण आपटे आणि इतर सहा जणांसोबत हत्येचा कट रचला.
नथुराम विनायक गोडसे | |
---|---|
जन्म | १९ मे १९१० बारामती, पुणे, ब्रिटिश भारत |
मृत्यू | १५ नोव्हेंबर, १९४९ (वय ३९) अंबाला, पंजाब, भारत |
मृत्यूचे कारण | फाशी |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
ख्याती | गांधी-हत्या |
वडील | विनायक वामनराव गोडसे |
आई | लक्ष्मी विनायक गोडसे |
एक वर्षभर चाललेल्या खटल्यानंतर, गोडसेला ८ नोव्हेंबर १९४९ रोजी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. गांधींचे दोन पुत्र, मणिलाल गांधी आणि रामदास गांधी यांनी क्षमायाचना केल्या होत्या, परंतु त्या भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, उपपंतप्रधान वल्लभभाई पटेल आणि गव्हर्नर-जनरल सी. राजगोपालाचारी यांनी फेटाळून लावल्या. गोडसे याला 15 नोव्हेंबर 1949 रोजी अंबाला मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली.
नथुराम विनायक गोडसे याचा जन्म १९ मे १९१०ला भारताच्या महाराष्ट्र राज्यात पुण्याजवळ बारामती येथे झाला होता. त्याचे वडील विनायक वामनराव गोडसे हे पोस्ट ऑफिसात होते. आणि आई लक्ष्मी गृहिणी होती. त्याची आधीची ३ अपत्ये अल्पवयात मृत्यू पावल्याने फक्त एक मुलगीच जिवंत राहिली होती. आता मुलगा व्हावा म्हणून आईवडिलांनी ईश्वराकडे प्रार्थना केली होती, की मुलगा झाल्यास त्याचे नाक टोचू.. त्यामुळे जरी जन्म नाव रामचंद्र असले तरी पुढे लोक मुलाला नथुराम म्हणू लागले. तेच नाव पुढे प्रसिद्ध झाले. नथुरामला गोपाळ नावाचा एक भाऊही होता. त्याचे नाव गोपाळ गोडसे.
नथुराम गोडसे लहानपणी ध्यानावस्थेत जाऊन जे श्लोक म्हणत ते त्यांनी कधीच वाचले नव्हते, असे म्हणतात. या अवस्थेमध्ये ते आपले कुटुंब आणि कुलदेवता यांच्या दरम्यान माध्यमाचे काम करीत असेही सांगितले जाते. पण हे सगळे वयाच्या १६ व्या वर्षापासून संपून गेले . त्यांची रुची देशाच्या हित कार्यात लागण्यात समर्थ ठरेल असे त्यांना वाटून ते देशासाठी आणि फुटीर मुस्लिमांच्या विरोधी उभे राहिले.
यांचे प्राथमिक शिक्षण पुण्यात झाले. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेण्यासाठी त्यांनी यांनी हायस्कूलचे शिक्षण मध्येच सोडले. यानंतर कुठलेही औपचारिक शिक्षण न घेता धार्मिक पुस्तकांत मन रमवले. त्यांनी रामायण, महाभारत, गीता, पुराण, स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद, बाळ गंगाधर टिळक, मोहनदास गांधी यांच्या साहित्याचा खोलवर अभ्यास केला होता .
आधी सुरुवातीला नथुराम गोडसे अखिल भारतीय काँग्रेस या पक्षामध्ये होते, नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शेवटी सन १९३०मध्ये ते अखिल भारतीय हिंदू महासभेत गेले. ते "अग्रणी " आणि "हिंदू राष्ट्र " या वर्तमानपत्रांचे संपादक होते. ते आपल्या वर्तमानपत्रांतून मोहंमद अली जिना यांच्या फुटीरतेच्या विचारांचा प्रखर विरोध करीत. सुरुवातीला यांनी मोहनदास करमचंद गांधी यांच्या कार्यक्रमांना पाठिंबा दिला, पण पुढे गांधीची हिंदूंबरोबरची कथित भेदभावपूर्ण नीती आणि त्यांचे तथाकथित मुस्लिम तुष्टीकरण यांमुळे ते गांधीविरोधी झाले. त्याआधी त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांच्या विरुद्ध संघर्षही केला होता.
१९४० मध्ये हैदराबादच्या शासक निझामाने राज्यात राहण्याऱ्या हिंदूंवर जिझिया कर लावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा हिंदू महासभेने निषेध केला. त्या वेळेस, हिंदुमहासभेचे अध्यक्ष विनायक दामोदर सावरकर यांच्या आदेशावरून हिंदू महासभेचा पहिला गट नथुराम गोडसे यांचा नेतृत्वाखाली हैदराबादला निझामाला विरोध करण्यासाठी गेला. निझामाने या सर्वांना बंदिस्त करून कठोर दंड दिला, मात्र त्यानंतर, निझामाला जिझिया कर लावण्याचा त्याचा निश्चय मागे घ्यावा लागला .
१९४७ मध्ये भारताची फाळणी झाली आणि त्या वेळेस झालेल्या धार्मिक दंगलींमुळे गोडसे अत्याधिक दुःखी झाले. या परिस्थितीसाठी त्यांना मोहनदास गांधी सर्वस्वी जवाबदार वाटले .
फाळणीचा वेळेस झालेल्या निर्णयानुसार भारताने पाकिस्तानला ७५ कोटी रुपये द्यायचे होते. त्यातले २० कोटी रुपये दिले गेले होते, आणि त्याच वेळेस पाकिस्तानने काश्मीरवर आक्रमण केले. त्यामुळे भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी उरलेले ५५ कोटी रुपये पाकिस्तानला न देण्याचा निर्णय घेतला. पण भारत सरकारचा या निर्णयाच्या विरोधात महात्मा गांधी उपोषणाला बसले. गांधींच्या या निर्णयामुळे कष्टी होऊन आणि चिडून नथुराम गोडसे आणि त्यांच्या काही साथीदारांनी गांधी हत्येचा कट रचला.
गांधींच्या उपोषणामुळे क्षुब्ध झालेले नथुराम गोडसे आणि त्यांच्या साथीदारांपैकी मदनलाल पाहवा याने गांधींच्या प्रार्थना सभेत जानेवारी १९४८ मधे बॉम्ब टाकला. त्या वेळेस झालेल्या गोंधळामध्ये गांधींवर पिस्तूल झाडण्याची योजना होती. पण पिस्तूल चालले नाही आणि अंती नथुराम गोडसे आणि बाकी मित्र पळून पुण्यास आले. मदनलाल पाहवाला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर नथुराम गोडसे गांधींना मारण्यासाठी परत दिल्लीत आले. तेथे पाकिस्तानातून आलेल्या हिंदू आणि शीख निर्वासितांमध्ये फिरताना त्यांनी एकाकडून एक पिस्तूल विकत घेतले.
३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे दिल्ली येथील बिर्ला भवनात गांधींच्या प्रार्थना सभेत गांधींच्या ४० मिनिटे आधी पोहचले. गांधी सभेसाठी जात असताना नथुराम यांनी पिस्तुलातून तीन गोळ्या झाडून मोहनदास करमचंद गांधी यांचा खून केला. गांधी यांची हत्या करण्यासाठी बरेटा मॉडेलचे पिस्तूल वापरले होते. खुनानंतर पळून जाण्याचा गोडसे यांनी अजिबात प्रयत्न केला नाही. कारण त्यांना गांधींना नाही तर त्यांच्या आक्षेपार्ह विचारांना मारल्याचे समाधान एकीकडे आणि आपल्या गुन्ह्याची कबुली एकीकडे होते.
नथुराम गोडसेंवर मोहनदास गांधी यांचा हत्येचा खटला पंजाब उच्च न्यायालयात चालविण्यात आला. याव्यतिरिक्त त्यांच्यावर अवैध शस्त्र बाळगणे यांसारखे अजून १७ आरोप ठेवून खटले चालविण्यात आले होते .
खून खटल्याच्यावेळी न्यायमूर्ती खोसला यांनी नथुराम गोडसे यांना त्यांचे निवेदन स्वतःच वाचावे यासाठी परवानगी दिली होती. मात्र नथुराम गोडसेंचे ते निवेदन भारत सरकारने प्रतिबंध घालून प्रसिद्ध करण्यास मनाई केली होती. या प्रतिबंधाच्या विरोधात नथुरामांचे भाऊ आणि गांधी हत्येचे सहअपराधी गोपाळ गोडसे यांनी ६० वर्षे न्यायालयीन लढाई केली. परिणामस्वरूप सर्वोच्च न्यायालयाने हा प्रतिबंध काढायला लावला आणि निवेदनाच्या प्रकाशनाला परवानगी दिली .
न्यायालयात नथुराम गोडसे यांनी गांधीहत्येची जी १५० कारणे सांगितली होती. त्यांतली फक्त थोडी - थोडकी कारणेच भारत सरकारने लोकांसमोर आणली त्यातील काही प्रमुख अशी --
नथुराम गोडसे आणि सहआरोपी नारायण आपटे यांना १५ नोव्हेंबर १९४९ला पंजाबमधील अंबाला जेलमध्ये फाशी देण्यात आली. त्यांचे अंतिम शब्द असे होते, "जर आपल्या मातृभूमीसाठी भक्तिभाव ठेवणे पाप असेल तर मी ते पाप केले आहे, आणि जर मी हे पुण्य केले असेल तर या पुण्यावर मी माझा नम्र अधिकार आहे असे जाहीर करतो.[ संदर्भ हवा ]
नथुराम गोडसे यांच्यावर मराठी-इंग्रजीत अनेक पुस्तके लिहिली गेली. हिंदी-गुजराथी भाषांत या पुस्तकांची भाषांतरे झाली आहेत. पुस्तकांची नावे :-
This article uses material from the Wikipedia मराठी article नथुराम गोडसे, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.